तुमच्या मते तुमचे बाळ जगातले सगळ्यात cute बाळ असते
तुमच्या मते तुमचे बाळ खूप हुशार असते, त्याला तुम्ही बोललेले सगळे काही समजते आणि ते तुम्हाला प्रतिसाद ही देते.
तुम्ही मैत्रिणींबरोबर फक्त बाळाबद्दल बोलता, अगदी त्याच्या शी-शू पासून, जो-जो आणि मम्म, सगळ्याबद्दल तितक्याच आत्मियतेने चर्चा करता. (हळू हळू तुमच्या मैत्रिणींचे फोन येणेही कमी होऊ लागते)
तुमचे बाळ इतर कुणाशीही खेळायला लागले (त्याचा बाबा included) की तुम्हाला त्या व्यक्तीचा मत्सर वाटतो.
बाळाने कितीही त्रास दिला तरी तुम्ही त्याचीच बाजू घेता, त्याला बरे वाटत नसते किंवा झोप येत असते म्हणून ते असे वागते असे तुमचे ठाम मत असते.
तुमच्या बाळाच्या बरोबरीच्या मुलांपेक्षा तुमचे बाळ नेहमीच पुढे असते. त्याची प्रगती इतरांपेक्षा नेहमीच fast होते.
तुम्ही घरी फोन केला की विनाकारण फोन speaker mode वर ठेऊन बाळाच्या आजी-आजोबा, मामा-मामी, काका-काकू आणि इतर सर्व नातेवाईकांना आवाज ऐकवता आणि बाळ किती छान बोलते आणि काय काय नवीन गोष्टी करते ह्यावर चर्चा करण्यातच तुमचा सगळा वेळ जातो.
तुम्ही पुन्हा पुन्हा बाळाचे फोटो आणि व्हिडिओ बघता आणि दरवेळी तुम्हाला नव्याने ह्या गोष्टी पाहिल्याचा आनंद होत असतो.
ही आणि अशी बरीच लक्षणे आहेत... कधी अनुभवले आहे तुम्ही हे?
Tuesday, June 16, 2009
Monday, June 08, 2009
पुनरागमन
किती तरी दिवस झाले इथे येऊन, मध्ये एकदा नंदनचा प्रतिसाद वाचला आणि जाणवले खरेच किती तरी वर्षं झाली आपण काही लिहिलेच नाही. आयुष्यात इतक्या गोष्टी घडत होत्या की मला स्वतःसाठी पण वेळ मिळत नव्हता, लेखन वगैरे खूप दूरची गोष्ट आहे.
काही दिवसांपूर्वी आम्ही दोनाचे तीन झालॊ, बघता बघता माझे पिल्लु साडे नऊ महिन्याचे झालेदेखील. त्याच्या बाळलीलांपुढे दुसरं काही सुचतच नव्हते. असो, you will see more of me now onwards. भेटूच..
काही दिवसांपूर्वी आम्ही दोनाचे तीन झालॊ, बघता बघता माझे पिल्लु साडे नऊ महिन्याचे झालेदेखील. त्याच्या बाळलीलांपुढे दुसरं काही सुचतच नव्हते. असो, you will see more of me now onwards. भेटूच..
Wednesday, March 21, 2007
मी कोण?
मी ४-५ वर्षांची होते तेव्हा आमच्या घराच्या अगदी जवळ एक झोपडपट्टी होती. येता-जाता तिथल्या मुलांना खेळताना बघायचे. कळत-नकळत त्यांच्यात आणि आम्हा मुलांमध्ये काही तरी नातं निर्माण झालं होतं. आम्ही कधीही त्यांच्याशी खेळलो नाही, कधी त्यांच्याशी बोललो ही नाही, पण त्यांची नावं मात्र तोंडपाठ होती.
एका दिवाळीला मी आणि माझी चुलत भावंडं, आम्ही अंगणात फटाके उडवत होतो. आमच्या अंगणाला एक मोठं लोखंडी फाटक आहे, त्या झोपडपट्टीतली काही मुलं त्या फाटकाला लोंबकाळून आम्हाला फटाके उडवताना बघत होती, एखादा फुसका बार निघाला की मागून घेत होती. त्या सगळ्या फटाक्यातली दारू काढून त्याचा भुसनाळा करण्यासाठी. मला आठवत ही नाही मला त्यावेळी काय वाटलं, पण मी घरातून माझ्या वाटणीचे सगळे फटाके आणले आणि त्या मुलांमध्ये वाटून टाकले. असं वागल्याबद्दल मला घरातलं कुणीच रागवलं नाही. उलट मला बक्षिस म्हणून नवीन फटाके मिळाले.
११वी ला होते तेव्हा किल्लारीचा भूकंप झाला. आम्ही मुलं घराघरात जाऊन पैसे, कपडे, वस्तू गोळा करत होतो. १०वीच्या बक्षिसांचे साठलेले सगळे पैसे मी देऊन टाकावे असं आईनं सुचवलं आणि मी ते केलं ही होतं.
लहानपणापासून माझ्या सामाजिक जाणीवा अगदी मुद्दाम नव्हे, पण अश्या कित्येक प्रसंगातून निर्माण होत गेल्या. आपण समाजाचं देणं लागतो, कमावलेल्या पैशाचा थोडासा हिस्सा चांगल्या कामात खर्च करावा ह्याचं बाळकडू मिळत गेलं. आज मागं वळून बघताना जाणवतं, आयुष्याच्या वाटेवर चालताना, चांगल्या-वाईट प्रसंगातून जाताना, कधी तरी माझ्याही नकळत मी त्या जाणीवा हरवून बसले आहे. थोडेफार पैसे-वस्तू कुठल्या तरी संस्थेला दान करताना देखील आधी मनात हिशोब केला जातो की ह्याचे टॅक्स बेनेफिट्स नेमके काय मिळतील. ५०-१०० डॊलर देताना देखील १० वेळा विचार करते मी. मी, माझं, माझ्यासाठी ह्याच्या पलिकडे विचारच नाही केला जात.
ही मी आणि आपले फटाके उचलून देऊन टाकणारी मी... मी नेमकी कोण आहे?
एका दिवाळीला मी आणि माझी चुलत भावंडं, आम्ही अंगणात फटाके उडवत होतो. आमच्या अंगणाला एक मोठं लोखंडी फाटक आहे, त्या झोपडपट्टीतली काही मुलं त्या फाटकाला लोंबकाळून आम्हाला फटाके उडवताना बघत होती, एखादा फुसका बार निघाला की मागून घेत होती. त्या सगळ्या फटाक्यातली दारू काढून त्याचा भुसनाळा करण्यासाठी. मला आठवत ही नाही मला त्यावेळी काय वाटलं, पण मी घरातून माझ्या वाटणीचे सगळे फटाके आणले आणि त्या मुलांमध्ये वाटून टाकले. असं वागल्याबद्दल मला घरातलं कुणीच रागवलं नाही. उलट मला बक्षिस म्हणून नवीन फटाके मिळाले.
११वी ला होते तेव्हा किल्लारीचा भूकंप झाला. आम्ही मुलं घराघरात जाऊन पैसे, कपडे, वस्तू गोळा करत होतो. १०वीच्या बक्षिसांचे साठलेले सगळे पैसे मी देऊन टाकावे असं आईनं सुचवलं आणि मी ते केलं ही होतं.
लहानपणापासून माझ्या सामाजिक जाणीवा अगदी मुद्दाम नव्हे, पण अश्या कित्येक प्रसंगातून निर्माण होत गेल्या. आपण समाजाचं देणं लागतो, कमावलेल्या पैशाचा थोडासा हिस्सा चांगल्या कामात खर्च करावा ह्याचं बाळकडू मिळत गेलं. आज मागं वळून बघताना जाणवतं, आयुष्याच्या वाटेवर चालताना, चांगल्या-वाईट प्रसंगातून जाताना, कधी तरी माझ्याही नकळत मी त्या जाणीवा हरवून बसले आहे. थोडेफार पैसे-वस्तू कुठल्या तरी संस्थेला दान करताना देखील आधी मनात हिशोब केला जातो की ह्याचे टॅक्स बेनेफिट्स नेमके काय मिळतील. ५०-१०० डॊलर देताना देखील १० वेळा विचार करते मी. मी, माझं, माझ्यासाठी ह्याच्या पलिकडे विचारच नाही केला जात.
ही मी आणि आपले फटाके उचलून देऊन टाकणारी मी... मी नेमकी कोण आहे?
Wednesday, February 28, 2007
मनातल्या मोरपिसांची....
हातावरुन अगदी हळूवारपणे मोरपिस फिरावं, हलक्याश्या, अगदी हव्याहव्याश्या गुदगुल्या व्हाव्या आणि सारं अंग शहारून जावं.. अगदी असेच काही मोरपंखी क्षण आठवावेसे वाटले, म्हणून हा लेखन प्रपंच!!
माझ्या भावाचा जन्म.. माझ्या आयुष्यातला एक सोनेरी क्षण. मी नऊ वर्षांची होते तेव्हा. माहित नाही का, पण मला भावंड हवंच होतं. खूप एकटं वाटायचं मला कधी कधी. माझा माझ्या चुलत भावावर खूप जीव होता. त्यानं मला value दिलेली माझ्या चुलत बहिणीला खपायचं नाही, ती ही तशी लहानच होती म्हणा, पण ती मला नेहमी चिडवायची. म्हणायची हा काही तुझा सख्खा भाऊ नाही, चुलत भाऊ आहे. अर्थात हे मलाही माहित होतं, पण का कोण जाणे खूप लागायचं मनाला तिचं चिडवणं. आणि मग माझ्या आयुष्यात माझा भाऊ आला. He is extremely important part of my life and will always be!!
शाळेत असतानाची गोष्ट. आठवीत असेन बहुदा, आता तर आठवत पण नाही. माझ्या एका वर्गमैत्रिणीकडं आम्हाला जेवायला जायचे होते एका रविवारी. बहुदा काही खास कारण नव्हतं, असंच चकाट्या पिटायला भेटायचं ठरलं होतं. माझ्या ह्या मैत्रिणीचा एक चुलत भाऊ, तो ही आमच्याच शाळेत होता, आमच्या एक वर्ष पुढे. त्याची माझी खरं तर काही ओळख नव्हती. पण उगाच चार लोकांची प्रकरणं आहेत आणि आपलंही असावं अशा काहीश्या भावनेनं असेल कदाचित.. तर त्याला म्हणे मी आवडायचे. अर्थात तेव्हा माझ्यात आवडण्यासारखं काय होतं ते तो बापडाच जाणो. मला ह्या गोष्टीची थोडी फार कल्पना होती आणि त्या अल्लड वयात वाटायला हवा तसा आनंदही होत होता ह्या विचारानं की आपल्यालाही कुणी तरी भाव देतेय :) त्या दिवशी त्यांच्या घरी जेवण वगैरे झाल्यावर आम्ही अशाच गप्पा मारत बसलो होतो, तो बिचारा ३-४ वेळा त्या खोलीत येऊन गेला, थोड्या वेळानं माझ्या मैत्रिणीला बाहेर नेऊन त्याने काही तरी सांगितले. मग ते दोघे ही आणि त्याचे १-२ मित्र आत आले आणि बराच वेळ आम्ही एकत्र टाईम पास केला. थोड्या वेळानं एकेकजण काही ना काही कारण काढून बाहेर पळायला लागला. ह्यांचा नेमका काय प्लॅन आहे ते न कळण्याइतकी मी वेडी नव्हते. त्याला मला "propose" करायचे होते. आज इतक्या वर्षांनी प्रेम म्हणजे काय, "propose" करणे नेमके कशाला म्हणतात ते कळतंय. पण तेव्हा.. असो. सगळे पांगल्यावर त्यानं काही तरी इकड-तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली. पण मुद्द्याला हात घालायला कही त्याला जमेना, शाळेत असताना मी अति बिनधास्त Tomboyish टाइपची होते. त्यामुळे त्याची उडालेली धांदल बघून मला खूप मजा येत होती. शेवटी एकदाचं सगळं धैर्य एकवटून त्यानं बोलायला सुरुवात केली. मला तू आवडतेस वगैरे प्रस्तावना संपून नेमका प्रश्न विचारायची वेळ आली. त्यानं प्रश्न विचारायला तोंड उघडलं आणि नेमकं तेव्हाच रस्त्यावर एका गाढवानं जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. इतका वेळ दाबून ठेवलेलं हसू आता मात्र मला आवरेना. मला जोरजोरात हसताना बघून त्याला काय करावं सुचेना, माझं हसणं ऐकून मी त्याला होकार देणार का ह्याचे अंदाज बांधत बाहेर बसलेले सगळे आत आले आणि त्याचा पडलेला चेहरा बघून ते ही गोंधळले. शेवटी वैतागून तो खोलीबाहेर निघून गेला आणि माझ्या आयुष्यातल्या पहिल्या proposal चा fiasco झाला. त्यानंतर ही त्याच्या घरी जाणं-येणं सुरुच राहिलं पण त्या दिवसानंतर तो मात्र कधीही माझ्याशी बोललादेखील नाही.
त्यानंतर मुलींना शाळा-कॊलेजात जे काही गोड-कडू अनुभव मुलांकडून येतात ते मलाही आले. पण ह्या पहिल्या proposal fiasco नंतरचा आवर्जून लक्षात रहावा असा प्रसंग इंजिनीअरिंगच्या तिस~या वर्षाला असताना आला. मी त्यादिवशी रुमवर एकटी होते. माझ्या रुममेटस कुठल्या तरी टेक्निकल एक्स्पोला गेल्या होत्या. मी संध्याकाळी काही तरी वाचत बसले होते आणि दार वाजलं. तो समोर उभा होता, अर्थात तो आणि त्याच्या बरोबर आमचा सगळाच ग्रुप रोजच भेटायचा, त्यामुळे आज ही भेटणार हे माहितच होतं. पण आज तो एकटा आला होता. त्यानंतरचे आमचे संवाद असे काहिसे होते,
तो: मला तुझ्याशी काही तरी बोलायचंय.
मी: बोल
तो: तुला नाही कळलं इतक्या दिवसांत?
मी: (उगाच साळसूदपणाचा आव आणत) काय?
तो: खरंच नाही कळलं..
मी: (गाढवा, कळलं असेल-नसेल, तू बोलून टाक ना - हे मनातल्या मनात बरं का) नाही रे बाबा, काय कळायचं होतं.
तो: नाही कळलं, मग जाऊ दे, आपण कळेपर्यंत वाट बघू
मी: (अरे देवा, हा असाच जातो की काय परत, काय पण माणूस आहे, ह्याला बोलतं केलंच पाहिजे आज) तसं थोडं फार कळलंय (आता तरी सांग की माठ्या)
तो: कळलंय ना, मग काय सांगायचं तुला पुन्हा, चल तर जातो मी
मी:............... (आवाक!! एक लंबी खामोशी)
हे बोलून तो खरंच निघून गेला.
आज हे "ध्यान" माझा "आवं धनी" झालाय. आमचं लग्न झालं, पण त्यानं मला कधीच formally propose वगैरे केलं नाही. :)
मी साधारण तिसरीत वगैरे होते ना तेव्हापासूनची माझी मैत्रिण नीता. आमच्या घरासमोर त्यांनी बंगला घेतला आणि ते रहायला आल्या दिवसापासून आमची मैत्री झाली ती आज ही टिकून आहे. त्यांचं व्यापारी घराणं होतं. चुलत भावंडं कळायला लागलं तशी व्यापाराकडं वळली, पण नीताच्या आई-वडिलांना शिक्षणाचं महत्त्व वाटत होतं, ही सगळी भावंडं शिकली. चुलत बहिणी १८वं सरतंय न सरतंय तोवर दोनाचे चार हात करून सासरी गेल्या. त्यामानानं नीताचं लग्न २० व्या वर्षी म्हणजे तसं उशिराच झालं. लग्नानंतर लगेचच सासर-माहेर दोन्हीकडून मुलांसाठी दबाव यायला लागला आणि त्या दबावामुळे असेल किंवा स्वेच्छेने असेल, नीताला दिवस राहिले. माझ्या बरोबरीनं खेळणारी, भांडणारी, रडणारी, चिडणारी, अगदी मारामारीदेखील करणारी नीता आई होणार... त्यानंतर एकेक करून मैत्रिणींची लग्नं होत गेली, त्यांना मुलंही झाली आणि प्रत्येकवेळी मनावरून अगदी तसंच मोरपिस फिरलं. माझ्या चुलत बहिणीला मागच्या वर्षी मुलगा झाला. आमच्या पुढच्या पिढीची सुरुवात.. त्याला जेव्हा मी हातात घेतलं तेव्हा का माहित नाही, पण खूप छान वाटलं. इतकं नाजूक, सुंदर, अनमोल जगात दुसरं काही असूच शकत नाही असं काहीसं.
आज लिहायला बसले आणि असे कितीतरी प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. काय लिहायचं आणि काय नाही कळेना. मनावरुन मोरपिस पुन्हा फिरायला लागलं आणि पुन्हा अंग शहारलं...
माझ्या भावाचा जन्म.. माझ्या आयुष्यातला एक सोनेरी क्षण. मी नऊ वर्षांची होते तेव्हा. माहित नाही का, पण मला भावंड हवंच होतं. खूप एकटं वाटायचं मला कधी कधी. माझा माझ्या चुलत भावावर खूप जीव होता. त्यानं मला value दिलेली माझ्या चुलत बहिणीला खपायचं नाही, ती ही तशी लहानच होती म्हणा, पण ती मला नेहमी चिडवायची. म्हणायची हा काही तुझा सख्खा भाऊ नाही, चुलत भाऊ आहे. अर्थात हे मलाही माहित होतं, पण का कोण जाणे खूप लागायचं मनाला तिचं चिडवणं. आणि मग माझ्या आयुष्यात माझा भाऊ आला. He is extremely important part of my life and will always be!!
शाळेत असतानाची गोष्ट. आठवीत असेन बहुदा, आता तर आठवत पण नाही. माझ्या एका वर्गमैत्रिणीकडं आम्हाला जेवायला जायचे होते एका रविवारी. बहुदा काही खास कारण नव्हतं, असंच चकाट्या पिटायला भेटायचं ठरलं होतं. माझ्या ह्या मैत्रिणीचा एक चुलत भाऊ, तो ही आमच्याच शाळेत होता, आमच्या एक वर्ष पुढे. त्याची माझी खरं तर काही ओळख नव्हती. पण उगाच चार लोकांची प्रकरणं आहेत आणि आपलंही असावं अशा काहीश्या भावनेनं असेल कदाचित.. तर त्याला म्हणे मी आवडायचे. अर्थात तेव्हा माझ्यात आवडण्यासारखं काय होतं ते तो बापडाच जाणो. मला ह्या गोष्टीची थोडी फार कल्पना होती आणि त्या अल्लड वयात वाटायला हवा तसा आनंदही होत होता ह्या विचारानं की आपल्यालाही कुणी तरी भाव देतेय :) त्या दिवशी त्यांच्या घरी जेवण वगैरे झाल्यावर आम्ही अशाच गप्पा मारत बसलो होतो, तो बिचारा ३-४ वेळा त्या खोलीत येऊन गेला, थोड्या वेळानं माझ्या मैत्रिणीला बाहेर नेऊन त्याने काही तरी सांगितले. मग ते दोघे ही आणि त्याचे १-२ मित्र आत आले आणि बराच वेळ आम्ही एकत्र टाईम पास केला. थोड्या वेळानं एकेकजण काही ना काही कारण काढून बाहेर पळायला लागला. ह्यांचा नेमका काय प्लॅन आहे ते न कळण्याइतकी मी वेडी नव्हते. त्याला मला "propose" करायचे होते. आज इतक्या वर्षांनी प्रेम म्हणजे काय, "propose" करणे नेमके कशाला म्हणतात ते कळतंय. पण तेव्हा.. असो. सगळे पांगल्यावर त्यानं काही तरी इकड-तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली. पण मुद्द्याला हात घालायला कही त्याला जमेना, शाळेत असताना मी अति बिनधास्त Tomboyish टाइपची होते. त्यामुळे त्याची उडालेली धांदल बघून मला खूप मजा येत होती. शेवटी एकदाचं सगळं धैर्य एकवटून त्यानं बोलायला सुरुवात केली. मला तू आवडतेस वगैरे प्रस्तावना संपून नेमका प्रश्न विचारायची वेळ आली. त्यानं प्रश्न विचारायला तोंड उघडलं आणि नेमकं तेव्हाच रस्त्यावर एका गाढवानं जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. इतका वेळ दाबून ठेवलेलं हसू आता मात्र मला आवरेना. मला जोरजोरात हसताना बघून त्याला काय करावं सुचेना, माझं हसणं ऐकून मी त्याला होकार देणार का ह्याचे अंदाज बांधत बाहेर बसलेले सगळे आत आले आणि त्याचा पडलेला चेहरा बघून ते ही गोंधळले. शेवटी वैतागून तो खोलीबाहेर निघून गेला आणि माझ्या आयुष्यातल्या पहिल्या proposal चा fiasco झाला. त्यानंतर ही त्याच्या घरी जाणं-येणं सुरुच राहिलं पण त्या दिवसानंतर तो मात्र कधीही माझ्याशी बोललादेखील नाही.
त्यानंतर मुलींना शाळा-कॊलेजात जे काही गोड-कडू अनुभव मुलांकडून येतात ते मलाही आले. पण ह्या पहिल्या proposal fiasco नंतरचा आवर्जून लक्षात रहावा असा प्रसंग इंजिनीअरिंगच्या तिस~या वर्षाला असताना आला. मी त्यादिवशी रुमवर एकटी होते. माझ्या रुममेटस कुठल्या तरी टेक्निकल एक्स्पोला गेल्या होत्या. मी संध्याकाळी काही तरी वाचत बसले होते आणि दार वाजलं. तो समोर उभा होता, अर्थात तो आणि त्याच्या बरोबर आमचा सगळाच ग्रुप रोजच भेटायचा, त्यामुळे आज ही भेटणार हे माहितच होतं. पण आज तो एकटा आला होता. त्यानंतरचे आमचे संवाद असे काहिसे होते,
तो: मला तुझ्याशी काही तरी बोलायचंय.
मी: बोल
तो: तुला नाही कळलं इतक्या दिवसांत?
मी: (उगाच साळसूदपणाचा आव आणत) काय?
तो: खरंच नाही कळलं..
मी: (गाढवा, कळलं असेल-नसेल, तू बोलून टाक ना - हे मनातल्या मनात बरं का) नाही रे बाबा, काय कळायचं होतं.
तो: नाही कळलं, मग जाऊ दे, आपण कळेपर्यंत वाट बघू
मी: (अरे देवा, हा असाच जातो की काय परत, काय पण माणूस आहे, ह्याला बोलतं केलंच पाहिजे आज) तसं थोडं फार कळलंय (आता तरी सांग की माठ्या)
तो: कळलंय ना, मग काय सांगायचं तुला पुन्हा, चल तर जातो मी
मी:............... (आवाक!! एक लंबी खामोशी)
हे बोलून तो खरंच निघून गेला.
आज हे "ध्यान" माझा "आवं धनी" झालाय. आमचं लग्न झालं, पण त्यानं मला कधीच formally propose वगैरे केलं नाही. :)
मी साधारण तिसरीत वगैरे होते ना तेव्हापासूनची माझी मैत्रिण नीता. आमच्या घरासमोर त्यांनी बंगला घेतला आणि ते रहायला आल्या दिवसापासून आमची मैत्री झाली ती आज ही टिकून आहे. त्यांचं व्यापारी घराणं होतं. चुलत भावंडं कळायला लागलं तशी व्यापाराकडं वळली, पण नीताच्या आई-वडिलांना शिक्षणाचं महत्त्व वाटत होतं, ही सगळी भावंडं शिकली. चुलत बहिणी १८वं सरतंय न सरतंय तोवर दोनाचे चार हात करून सासरी गेल्या. त्यामानानं नीताचं लग्न २० व्या वर्षी म्हणजे तसं उशिराच झालं. लग्नानंतर लगेचच सासर-माहेर दोन्हीकडून मुलांसाठी दबाव यायला लागला आणि त्या दबावामुळे असेल किंवा स्वेच्छेने असेल, नीताला दिवस राहिले. माझ्या बरोबरीनं खेळणारी, भांडणारी, रडणारी, चिडणारी, अगदी मारामारीदेखील करणारी नीता आई होणार... त्यानंतर एकेक करून मैत्रिणींची लग्नं होत गेली, त्यांना मुलंही झाली आणि प्रत्येकवेळी मनावरून अगदी तसंच मोरपिस फिरलं. माझ्या चुलत बहिणीला मागच्या वर्षी मुलगा झाला. आमच्या पुढच्या पिढीची सुरुवात.. त्याला जेव्हा मी हातात घेतलं तेव्हा का माहित नाही, पण खूप छान वाटलं. इतकं नाजूक, सुंदर, अनमोल जगात दुसरं काही असूच शकत नाही असं काहीसं.
आज लिहायला बसले आणि असे कितीतरी प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. काय लिहायचं आणि काय नाही कळेना. मनावरुन मोरपिस पुन्हा फिरायला लागलं आणि पुन्हा अंग शहारलं...
Thursday, January 18, 2007
रंग माझा वेगळा!
"निसर्गसौंदर्य" म्हटले की आपल्या डोळयासमोर येतात ते मोठमोठे हिरवेगार डोंगर, त्यावर उतरलेले ढग, त्या डोंगरातून मधूनच कुठेतरी कोसळणारा धबधबा किंवा अथांग पसरलेला समुद्र, फेसाळलेल्या लाटा, क्षितिजावर टेकलेला सूर्य आणि वेगवेगळ्या रंगांनी न्हाऊन निघालेलं आकाश. झाडे, फुले, पाने, पाणी... हे सगळं आपल्याला सुंदर वाटतं. बरोबरच आहे म्हणा.. एखादा उघडाबोडका डोंगर बघून कुणाच्या तोंडून वाह वा निघेल? इतके दिवस माझाही असाच समज होता, पण आमच्या डेथव्हॅलीच्या सहलीनं माझा हा समज अगदी खोटा ठरवला. पहिल्यांदाच वाळवंटातलं सौंदर्य पाहिलं मी.
वाळवंटाचं ते रुप तुमच्यासाठी इथे देते आहे. आहे की नाही ह्याच्या रंग अगदी शब्दशः वेगळा?
वाळवंटाचं ते रुप तुमच्यासाठी इथे देते आहे. आहे की नाही ह्याच्या रंग अगदी शब्दशः वेगळा?

Wednesday, August 30, 2006
काय करावं अशा लोकांचं?
आज खूप दिवसांनी इकडे परतले. गेले काही दिवस कामाचा व्याप इतका वाढला होता की दुसरं काही करायला वेळच मिळत नव्हता. आज मुद्दाम ठरवून इकडे आले. असो!
मागच्या महिन्यात आम्ही इटलीला जाऊन आलो. रोम, पोंपई, व्हेनिस, मुरानो, फ्लोरेन्स, पिसा अशी कितीतरी ठिकाणं हिंडलो, प्रत्येक गावात वर्षानुवर्ष जतन करुन ठेवलेल्या इमारती बघताना खरंच आश्चर्यचकित व्हायला होत होतं. त्या काळात त्यांचं शास्त्र किती प्रगत होतं ह्याची पहिल्यांदाच जाणीव होत होती. ००७० साली ज्वालामुखीनंतर राखेखाली गेलेले पोम्पई शहर, त्याची रचना बघून त्या रचनाकारांचं कौतुक वाटत होतं. पण तेव्हाच जाणवलं, आपण भारतीय लोक पण तर असेच किंबहुना ह्यापेक्षाही जास्त प्रगत होतो, पण ऐतिहासिक वास्तु, दस्तावेज जतन करून ठेवण्याची आपली वृत्तीच नाही बहुदा. आपले किल्ले, वाडे म्हणजे कचरा करण्यासाठी, आपल्या प्रेमाची जाहिरात कोरून ठेवण्यासाठी, पान-तंबाखू-गुटख्याची पिंक टाकण्यासाठी, दारूच्या बाटल्या फोडण्यासाठी मिळालेली हक्काची जागा वाटते आपल्याला. आपली संस्कृती जतन करणा~या इटालियन लोकांचं तोंड भरुन कौतुक करताना माझ्या देशात चाललेली ही हेळसांड जास्त तीव्रतेनं जाणवली.
मी शेंगा खाऊन फोलपाटं तिथेच टाकली नाही म्हणून माझी खिल्ली उडवणारे लोक दुसते कुणी नाही माझे अगदी जवळचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक आहेत, ते पण so called सुशिक्षित. आपलं घर टापटीप ठेवणारे हे लोक, घरासमोरच्या बागेत मात्र भेळेच्या पुड्या, च्युइंग गम, कोक-पेप्सीच्या बाटल्या टाकून येतात. जर ह्या सुशिक्षित, जग हिंडलेल्या लोकांना शिस्त लावणं आपल्याला जमत नाही तर इतरांबद्दल बोलायलाच नको.
मागच्या महिन्यात आम्ही इटलीला जाऊन आलो. रोम, पोंपई, व्हेनिस, मुरानो, फ्लोरेन्स, पिसा अशी कितीतरी ठिकाणं हिंडलो, प्रत्येक गावात वर्षानुवर्ष जतन करुन ठेवलेल्या इमारती बघताना खरंच आश्चर्यचकित व्हायला होत होतं. त्या काळात त्यांचं शास्त्र किती प्रगत होतं ह्याची पहिल्यांदाच जाणीव होत होती. ००७० साली ज्वालामुखीनंतर राखेखाली गेलेले पोम्पई शहर, त्याची रचना बघून त्या रचनाकारांचं कौतुक वाटत होतं. पण तेव्हाच जाणवलं, आपण भारतीय लोक पण तर असेच किंबहुना ह्यापेक्षाही जास्त प्रगत होतो, पण ऐतिहासिक वास्तु, दस्तावेज जतन करून ठेवण्याची आपली वृत्तीच नाही बहुदा. आपले किल्ले, वाडे म्हणजे कचरा करण्यासाठी, आपल्या प्रेमाची जाहिरात कोरून ठेवण्यासाठी, पान-तंबाखू-गुटख्याची पिंक टाकण्यासाठी, दारूच्या बाटल्या फोडण्यासाठी मिळालेली हक्काची जागा वाटते आपल्याला. आपली संस्कृती जतन करणा~या इटालियन लोकांचं तोंड भरुन कौतुक करताना माझ्या देशात चाललेली ही हेळसांड जास्त तीव्रतेनं जाणवली.
मी शेंगा खाऊन फोलपाटं तिथेच टाकली नाही म्हणून माझी खिल्ली उडवणारे लोक दुसते कुणी नाही माझे अगदी जवळचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक आहेत, ते पण so called सुशिक्षित. आपलं घर टापटीप ठेवणारे हे लोक, घरासमोरच्या बागेत मात्र भेळेच्या पुड्या, च्युइंग गम, कोक-पेप्सीच्या बाटल्या टाकून येतात. जर ह्या सुशिक्षित, जग हिंडलेल्या लोकांना शिस्त लावणं आपल्याला जमत नाही तर इतरांबद्दल बोलायलाच नको.
Wednesday, June 07, 2006
गुणवत्तेचे कौतुक का करु नये?
गुणवत्ता यादी प्रसिद्ध करावी की नाही ह्यावरची चर्चा अलिकडे वाचनात आली आणि १०वी - १२वी चे दिवस पुन्हा आठवले. शाळेत “गुंड” म्हणून ज्या लोकांना ओळखले जाते, त्यांच्याकडून फारश्या अपेक्षा नाही ठेवल्या जात. मीसुद्धा त्याला अपवाद नव्हते. मी हुशार नव्हते असे नाही, शाळेत पहिल्या पाचात नेहमीच असायचे कारण फारसा अभ्यास न करता ते जमून जायचे. पण पहिला नंबर मिळवण्यासाठी झटण्याची वगैरे माझी कधीच तयारी नव्हती. त्यापेक्षा मित्र-मैत्रिणींबरोबर “टाइम-पास” करणे मला जास्त महत्त्वाचे वाटायचे. आई-बाबा पण मिळालेल्या गुणांवर खूष असायचे, त्यामुळे चौथ्याऐवजी पाचवा क्रमांक मिळण्याचे वाईट वाटावे अशी वेळच आली नाही. दहावीच्या परिक्षेपूर्वी माझ्या वर्गशिक्षिकेने माझ्या आईला सांगितलेही होते की “तुमची मुलगी हुशार आहे पण गुणवत्ता यादीत येण्यासाठी लागणारी एकाग्रता आणि प्रयत्न करण्याची तयारी मात्र तिच्यात नाही, तेव्हा तुम्ही फारश्या अपेक्षा ठेवू नका.” माझ्या आईला हे ऐकून वाईट वाटले होते ह्यात शंका नाही, तिची चिडचिडही झाली असावी, पण मला खरंच त्याचे काहीच वाटले नाही. पण हे ऐकून एका वर्गमैत्रिणीने केलेल्या कानउघाडणीनंतर मात्र मी अभ्यास करणे खरंच मनावर घेतले. १०वी च्या गुणवत्ता यादीत माझे नाव पाहून सगळ्या शिक्षकांना जबरी धक्का बसला होता. त्यादिवशी माझ्या आई-बाबांच्या चेह~यावर दिसलेले समाधान लाख मोलाचं होतं. तोपर्यंत गुणवत्ता यादी माझ्या दृष्टिनं कधीच इतकी महत्त्वाची नव्हती, पण त्या दिवसानंतर मात्र १२वी ला असेच यश पुन्हा मिळवायचे असे मी मनोमन ठरवून टाकले होते. शाळेत किंवा महाविद्यालयात आजही आपले नाव झळकलेले आहे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. माझ्या बाबांच्या शाळेत मी गेले असताना त्यांचे नाव असेच झळकलेले पाहून माझा ऊर अभिमानानं भरून आला होता, आणखी काही वर्षांनंतर माझ्या मुलांनासुद्धा असाच अभिमान माझ्याबद्दल वाटेल हा विचारच किती सुखद आहे. खरं तर आता मागे वळून पाहिल्यावर १०वी आणि १२वीचे यश खरंच इतके महत्त्वाचे वाटत नाही. पण त्याक्षणी, त्यावेळी ज्या भावना मी अनुभवल्या, जे सुख मी माझ्या कुटुंबियांच्या डोळ्यात पाहिले, ते त्या क्षणापुरते का होईना अनमोल होते. ह्या सगळ्या भावनांच्या अनुभूतीनंतर मी तरी कधीच गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याला विरोध करणार नाही. ह्याचे तोटे असतीलही, पण जर कुणी कष्टानं यश मिळवले असेल तर त्याचे कौतुक करण्यात गैर काय आहे हे मला तरी कळत नाही आहे.
Subscribe to:
Posts (Atom)