<?xml version='1.0' encoding='UTF-8'?><?xml-stylesheet href="http://www.blogger.com/styles/atom.css" type="text/css"?><feed xmlns='http://www.w3.org/2005/Atom' xmlns:openSearch='http://a9.com/-/spec/opensearchrss/1.0/' xmlns:georss='http://www.georss.org/georss' xmlns:gd='http://schemas.google.com/g/2005' xmlns:thr='http://purl.org/syndication/thread/1.0'><id>tag:blogger.com,1999:blog-22119614</id><updated>2011-07-07T19:58:23.305-07:00</updated><title type='text'>गप्पा गोष्टी</title><subtitle type='html'>कधी मनाला आलेली मरगळ दूर करण्यासाठी, कधी एकटेपणा घालवण्यासाठी, तर कधी फक्त गंमत म्हणून.. केलेल्या ह्या "गप्पा गोष्टी"</subtitle><link rel='http://schemas.google.com/g/2005#feed' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/posts/default'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default?max-results=100'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/'/><link rel='hub' href='http://pubsubhubbub.appspot.com/'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><generator version='7.00' uri='http://www.blogger.com'>Blogger</generator><openSearch:totalResults>23</openSearch:totalResults><openSearch:startIndex>1</openSearch:startIndex><openSearch:itemsPerPage>100</openSearch:itemsPerPage><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-407128277183477169</id><published>2010-05-24T13:34:00.000-07:00</published><updated>2010-05-25T12:52:56.877-07:00</updated><title type='text'>बाकी ठीक!!</title><content type='html'>काल घरी फोन केला होता, हल्ली रोजच करावा लागतो. आजी-आजोबांना नातवाशी आणि नातवाला त्यांच्याशी चकाट्या पिटायच्या असतात. मग फोनवर "हेलॊ", "गुड मॊर्निंग", "how r u", "काय करताय" अशा चौकश्या करुन झाल्या की चिरंजीव "बाबा रागवला", "मी पडलो, लागलॆ" वगैरे तक्रारी करतात. ते झालं की आजोबा त्याला गाणे म्हणून दाखवतात. गाणीदेखील ठरलेलीच असतात, "राम नारायण बाजा बजा तो" आजोबानी म्हणायचे आणि मामा असेल तर "मेरी laundry का एक बिल" चालतं. मग इकडून "A B C D", "baa baa black sheep" च्या फैरी झडतात. मग काही तरी अतिशय असंबद्ध बडबड केली जाते, आजी-आजोबांना त्याचेही प्रचंड कौतुक वाटते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;तर ह्या अश्या रोजच्या गप्पांमध्ये काल एका नव्या वाक्याची भर पडली. काल बोलता बोलता नातवाने आजोबांना सांगितले "बाकी ठीक!!" :) आम्ही बोलताना ऐकले असेल कधी तरी. त्याचं लक्ष कुठेकुठे आणि किती असते हे कळत देखील नाही. असो, त्याचं बाकी ठीक ऐकून मला आणि त्याच्या बाबाला इतकं हसू येत होते ना.. असो.. २ दिवसात पिल्लू पावणे दोन वर्षाचा होणार. दिवस कसे भुर्रकन उडून जाताहेत. "बाबा".."मामा".. ने सुरु झालेल्या त्याच्या बडबडीमध्ये आज निदान शे-दिडशे शब्दांची भर पडली आहे.. खूप मजा येते त्याचं बोलणं ऐकायला. looking fwd to more of his funny vocabulary :)&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-407128277183477169?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/407128277183477169/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=407128277183477169' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/407128277183477169'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/407128277183477169'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2010/05/blog-post_24.html' title='बाकी ठीक!!'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-8816316680726032494</id><published>2010-05-19T13:47:00.000-07:00</published><updated>2010-05-20T14:53:11.533-07:00</updated><title type='text'></title><content type='html'>अमेरिकेत मराठी कुटुंबात जन्माला आल्यामुळे आमच्या चिरंजीवांचा मराठी आणि इंग्रजी ह्या दोन वेगळ्या भाषा नसून एकच आहेत आणि सगळे जग ही भेसळ भाषाच बोलते असा ठाम समज आहे. त्याचे काही नमुने..&lt;br /&gt;&lt;br /&gt;आमचे घर clean करण्यासाठी येणारी "Erika मावशी clean up clean up छान छान" करते आणि त्याच्या day care मधली "जिबा जान" आणि "दाऊद काका" त्याला "भुकु" लागली की "दुदु"आणि "भाता" देतात. "चिऊ" म्हणजे "birdie", "tree" वर बसून "मम्म" करते. "रामू Turtle" आणि "टोण्या fishie", "fish tank" मध्ये "लपून" बसतात. "आई" कधी कधी "मागे जाते", कधी "sit there", तर कधी कधी "come here" करते. "बाबा"ला कधी "Don't touch" असा दम दिला जातो तर कधी "माया माया" आणि "I love you" म्हणून जवळ घेतले जाते. रित्विक कधी "fell down" करतो तर कधी "डुबूककन पडतो" आणि "eyes" मध्ये "पापा" येऊन "जोरात रडतो".  त्याला "गरम गरम पोयी" (पोळी) आणि "पास्ता" खूप आवडतो. "भांड्याला झाकण बंद" करून "spoon"ने हलवून तो "Strawberry, banana, grapes, broccoli" आणि "वाटाणे" घालून "भाजी" करतो आणि त्यात "मीठ, मसाला, तिखट" पण घालतो. त्याच्या "पोटा"वरच्या "belly button" ला "गुदू गुदू" केले की त्याला खूप "गम्मत" येते. आईला रात्री "good night, sweet dreams, have fun" म्हणून तो बाबाच्या मांडीवर बसून "सीता राम सीता राम" आणि "राम नारायण" अशी "गाणी" ऐकतो आणि "जोजो" करतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आहे की नाही गम्मत?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-8816316680726032494?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/8816316680726032494/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=8816316680726032494' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/8816316680726032494'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/8816316680726032494'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2010/05/blog-post.html' title=''/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-5366284012248615875</id><published>2009-06-16T15:05:00.000-07:00</published><updated>2009-06-16T15:29:45.879-07:00</updated><title type='text'>आई झाल्याची लक्षणे</title><content type='html'>तुमच्या मते तुमचे बाळ जगातले सगळ्यात cute बाळ असते&lt;br /&gt;तुमच्या मते तुमचे बाळ खूप हुशार असते, त्याला तुम्ही बोललेले सगळे काही समजते आणि ते तुम्हाला प्रतिसाद ही देते.&lt;br /&gt;तुम्ही मैत्रिणींबरोबर फक्त बाळाबद्दल बोलता, अगदी त्याच्या शी-शू पासून, जो-जो आणि मम्म, सगळ्याबद्दल तितक्याच आत्मियतेने चर्चा करता. (हळू हळू तुमच्या मैत्रिणींचे फोन येणेही कमी होऊ लागते)&lt;br /&gt;तुमचे बाळ इतर कुणाशीही खेळायला लागले (त्याचा बाबा included)  की तुम्हाला त्या व्यक्तीचा मत्सर वाटतो.&lt;br /&gt;बाळाने कितीही त्रास दिला तरी तुम्ही त्याचीच बाजू घेता, त्याला बरे वाटत नसते किंवा झोप येत असते म्हणून ते असे वागते असे तुमचे ठाम मत असते.&lt;br /&gt;तुमच्या बाळाच्या बरोबरीच्या मुलांपेक्षा तुमचे बाळ नेहमीच पुढे असते. त्याची प्रगती इतरांपेक्षा नेहमीच fast होते.&lt;br /&gt;तुम्ही घरी फोन केला की विनाकारण फोन speaker mode वर ठेऊन बाळाच्या आजी-आजोबा, मामा-मामी, काका-काकू आणि इतर सर्व नातेवाईकांना  आवाज ऐकवता आणि बाळ किती छान बोलते आणि काय काय नवीन गोष्टी करते ह्यावर चर्चा करण्यातच तुमचा सगळा वेळ जातो.&lt;br /&gt;तुम्ही पुन्हा पुन्हा बाळाचे फोटो आणि व्हिडिओ बघता आणि दरवेळी तुम्हाला नव्याने ह्या गोष्टी पाहिल्याचा आनंद होत असतो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही आणि अशी बरीच लक्षणे आहेत... कधी अनुभवले आहे तुम्ही हे?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-5366284012248615875?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/5366284012248615875/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=5366284012248615875' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/5366284012248615875'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/5366284012248615875'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2009/06/blog-post_16.html' title='आई झाल्याची लक्षणे'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-571772906190897733</id><published>2009-06-08T14:02:00.000-07:00</published><updated>2009-06-08T14:22:09.160-07:00</updated><title type='text'>पुनरागमन</title><content type='html'>किती तरी दिवस झाले इथे येऊन, मध्ये एकदा नंदनचा प्रतिसाद वाचला आणि जाणवले खरेच किती तरी वर्षं झाली आपण काही लिहिलेच नाही. आयुष्यात इतक्या गोष्टी घडत होत्या की मला स्वतःसाठी पण वेळ मिळत नव्हता, लेखन वगैरे खूप दूरची गोष्ट आहे.&lt;br /&gt;&lt;br /&gt;काही दिवसांपूर्वी आम्ही दोनाचे तीन झालॊ, बघता बघता माझे पिल्लु साडे नऊ महिन्याचे झालेदेखील. त्याच्या बाळलीलांपुढे दुसरं काही सुचतच नव्हते. असो, you will see more of me now onwards. भेटूच..&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-571772906190897733?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/571772906190897733/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=571772906190897733' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/571772906190897733'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/571772906190897733'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2009/06/blog-post.html' title='पुनरागमन'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-4099419989671540114</id><published>2007-03-21T18:36:00.000-07:00</published><updated>2007-03-21T18:58:58.701-07:00</updated><title type='text'>मी कोण?</title><content type='html'>मी ४-५ वर्षांची होते तेव्हा आमच्या घराच्या अगदी जवळ एक झोपडपट्टी होती. येता-जाता तिथल्या मुलांना खेळताना बघायचे. कळत-नकळत त्यांच्यात आणि आम्हा मुलांमध्ये काही तरी नातं निर्माण झालं होतं. आम्ही कधीही त्यांच्याशी खेळलो नाही, कधी त्यांच्याशी बोललो ही नाही, पण त्यांची नावं मात्र तोंडपाठ होती.&lt;br /&gt;&lt;br /&gt;एका दिवाळीला मी आणि माझी चुलत भावंडं, आम्ही अंगणात फटाके उडवत होतो. आमच्या अंगणाला एक मोठं लोखंडी फाटक आहे, त्या झोपडपट्टीतली काही मुलं त्या फाटकाला लोंबकाळून आम्हाला फटाके उडवताना बघत होती, एखादा फुसका बार निघाला की मागून घेत होती. त्या सगळ्या फटाक्यातली दारू काढून त्याचा भुसनाळा करण्यासाठी. मला आठवत ही नाही मला त्यावेळी काय वाटलं, पण मी घरातून माझ्या वाटणीचे सगळे फटाके आणले आणि त्या मुलांमध्ये वाटून टाकले. असं वागल्याबद्दल मला घरातलं कुणीच रागवलं नाही. उलट मला बक्षिस म्हणून नवीन फटाके मिळाले.&lt;br /&gt;&lt;br /&gt;११वी ला होते तेव्हा किल्लारीचा भूकंप झाला. आम्ही मुलं घराघरात जाऊन पैसे, कपडे, वस्तू गोळा करत होतो. १०वीच्या बक्षिसांचे साठलेले सगळे पैसे मी देऊन टाकावे असं आईनं सुचवलं आणि मी ते केलं ही होतं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;लहानपणापासून माझ्या सामाजिक जाणीवा अगदी मुद्दाम नव्हे, पण अश्या कित्येक प्रसंगातून निर्माण होत गेल्या. आपण समाजाचं देणं लागतो, कमावलेल्या पैशाचा थोडासा हिस्सा चांगल्या कामात खर्च करावा ह्याचं बाळकडू मिळत गेलं. आज मागं वळून बघताना जाणवतं, आयुष्याच्या वाटेवर चालताना, चांगल्या-वाईट प्रसंगातून जाताना, कधी तरी माझ्याही नकळत मी त्या जाणीवा हरवून बसले आहे. थोडेफार पैसे-वस्तू कुठल्या तरी संस्थेला दान करताना देखील आधी मनात हिशोब केला जातो की ह्याचे टॅक्स बेनेफिट्स नेमके काय मिळतील. ५०-१०० डॊलर देताना देखील १० वेळा विचार करते मी. मी, माझं, माझ्यासाठी ह्याच्या पलिकडे विचारच नाही केला जात.&lt;br /&gt;&lt;br /&gt;ही मी आणि आपले फटाके उचलून देऊन टाकणारी मी... मी नेमकी कोण आहे?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-4099419989671540114?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/4099419989671540114/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=4099419989671540114' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/4099419989671540114'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/4099419989671540114'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2007/03/blog-post.html' title='मी कोण?'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-2870504392514543058</id><published>2007-02-28T18:11:00.000-08:00</published><updated>2007-03-09T14:51:18.574-08:00</updated><title type='text'>मनातल्या मोरपिसांची....</title><content type='html'>हातावरुन अगदी हळूवारपणे मोरपिस फिरावं, हलक्याश्या, अगदी हव्याहव्याश्या गुदगुल्या व्हाव्या आणि सारं अंग शहारून जावं.. अगदी असेच काही मोरपंखी क्षण आठवावेसे वाटले, म्हणून हा लेखन प्रपंच!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;माझ्या भावाचा जन्म.. माझ्या आयुष्यातला एक सोनेरी क्षण. मी नऊ वर्षांची होते तेव्हा. माहित नाही का, पण मला भावंड हवंच होतं. खूप एकटं वाटायचं मला कधी कधी. माझा माझ्या चुलत भावावर खूप जीव होता. त्यानं मला value दिलेली माझ्या चुलत बहिणीला खपायचं नाही, ती ही तशी लहानच होती म्हणा, पण ती मला नेहमी चिडवायची. म्हणायची हा काही तुझा सख्खा भाऊ नाही, चुलत भाऊ आहे. अर्थात हे मलाही माहित होतं, पण का कोण जाणे खूप लागायचं मनाला तिचं चिडवणं. आणि मग माझ्या आयुष्यात माझा भाऊ आला. He is extremely important part of my life and will always be!!&lt;br /&gt;&lt;br /&gt;शाळेत असतानाची गोष्ट. आठवीत असेन बहुदा, आता तर आठवत पण नाही. माझ्या एका वर्गमैत्रिणीकडं आम्हाला जेवायला जायचे होते एका रविवारी. बहुदा काही खास कारण नव्हतं, असंच चकाट्या पिटायला भेटायचं ठरलं होतं. माझ्या ह्या मैत्रिणीचा एक चुलत भाऊ, तो ही आमच्याच शाळेत होता, आमच्या एक वर्ष पुढे. त्याची माझी खरं तर काही ओळख नव्हती. पण उगाच चार लोकांची प्रकरणं आहेत आणि आपलंही असावं अशा काहीश्या भावनेनं असेल कदाचित.. तर त्याला म्हणे मी आवडायचे. अर्थात तेव्हा माझ्यात आवडण्यासारखं काय होतं ते तो बापडाच जाणो. मला ह्या गोष्टीची थोडी फार कल्पना होती आणि त्या अल्लड वयात वाटायला हवा तसा आनंदही होत होता ह्या विचारानं की आपल्यालाही कुणी तरी भाव देतेय :) त्या दिवशी त्यांच्या घरी जेवण वगैरे झाल्यावर आम्ही अशाच गप्पा मारत बसलो होतो, तो बिचारा ३-४ वेळा त्या खोलीत येऊन गेला, थोड्या वेळानं माझ्या मैत्रिणीला बाहेर नेऊन त्याने काही तरी सांगितले. मग ते दोघे ही आणि त्याचे १-२ मित्र आत आले आणि बराच वेळ आम्ही एकत्र टाईम पास केला. थोड्या वेळानं एकेकजण काही ना काही कारण काढून बाहेर पळायला लागला. ह्यांचा नेमका काय प्लॅन आहे ते न कळण्याइतकी मी वेडी नव्हते. त्याला मला "propose" करायचे होते. आज इतक्या वर्षांनी प्रेम म्हणजे काय, "propose" करणे नेमके कशाला म्हणतात ते कळतंय. पण तेव्हा.. असो. सगळे पांगल्यावर त्यानं काही तरी इकड-तिकडच्या गप्पा मारायला सुरुवात केली. पण मुद्द्याला हात घालायला कही त्याला जमेना, शाळेत असताना मी अति बिनधास्त Tomboyish टाइपची होते. त्यामुळे त्याची उडालेली धांदल बघून मला खूप मजा येत होती. शेवटी एकदाचं सगळं धैर्य एकवटून त्यानं बोलायला सुरुवात केली. मला तू आवडतेस वगैरे प्रस्तावना संपून नेमका प्रश्न विचारायची वेळ आली. त्यानं प्रश्न विचारायला तोंड उघडलं आणि नेमकं तेव्हाच रस्त्यावर एका गाढवानं जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. इतका वेळ दाबून ठेवलेलं हसू आता मात्र मला आवरेना. मला जोरजोरात हसताना बघून त्याला काय करावं सुचेना, माझं हसणं ऐकून मी त्याला होकार देणार का ह्याचे अंदाज बांधत बाहेर बसलेले सगळे आत आले आणि त्याचा पडलेला चेहरा बघून ते ही गोंधळले. शेवटी वैतागून तो खोलीबाहेर निघून गेला आणि माझ्या आयुष्यातल्या पहिल्या proposal चा fiasco झाला. त्यानंतर ही त्याच्या घरी जाणं-येणं सुरुच राहिलं पण त्या दिवसानंतर तो मात्र कधीही माझ्याशी बोललादेखील नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;त्यानंतर मुलींना शाळा-कॊलेजात जे काही गोड-कडू अनुभव मुलांकडून येतात ते मलाही आले. पण ह्या पहिल्या proposal fiasco नंतरचा आवर्जून लक्षात रहावा असा प्रसंग इंजिनीअरिंगच्या तिस~या वर्षाला असताना आला. मी त्यादिवशी रुमवर एकटी होते. माझ्या रुममेटस कुठल्या तरी टेक्निकल एक्स्पोला गेल्या होत्या. मी संध्याकाळी काही तरी वाचत बसले होते आणि दार वाजलं. तो समोर उभा होता, अर्थात तो आणि त्याच्या बरोबर आमचा सगळाच ग्रुप रोजच भेटायचा, त्यामुळे आज ही भेटणार हे माहितच होतं. पण आज तो एकटा आला होता. त्यानंतरचे आमचे संवाद असे काहिसे होते,&lt;br /&gt;तो: मला तुझ्याशी काही तरी बोलायचंय.&lt;br /&gt;मी: बोल&lt;br /&gt;तो: तुला नाही कळलं इतक्या दिवसांत?&lt;br /&gt;मी: (उगाच साळसूदपणाचा आव आणत) काय?&lt;br /&gt;तो: खरंच नाही कळलं..&lt;br /&gt;मी: (गाढवा, कळलं असेल-नसेल, तू बोलून टाक ना - हे मनातल्या मनात बरं का) नाही रे बाबा, काय कळायचं होतं.&lt;br /&gt;तो: नाही कळलं, मग जाऊ दे, आपण कळेपर्यंत वाट बघू&lt;br /&gt;मी: (अरे देवा, हा असाच जातो की काय परत, काय पण माणूस आहे, ह्याला बोलतं केलंच पाहिजे आज) तसं थोडं फार कळलंय (आता तरी सांग की माठ्या)&lt;br /&gt;तो: कळलंय ना, मग काय सांगायचं तुला पुन्हा, चल तर जातो मी&lt;br /&gt;मी:............... (आवाक!! एक लंबी खामोशी)&lt;br /&gt;हे बोलून तो खरंच निघून गेला.&lt;br /&gt;आज हे "ध्यान" माझा "आवं धनी" झालाय. आमचं लग्न झालं, पण त्यानं मला कधीच formally propose वगैरे केलं नाही. :)&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी साधारण तिसरीत वगैरे होते ना तेव्हापासूनची माझी मैत्रिण नीता. आमच्या घरासमोर त्यांनी बंगला घेतला आणि ते रहायला आल्या दिवसापासून आमची मैत्री झाली ती आज ही टिकून आहे. त्यांचं व्यापारी घराणं होतं. चुलत भावंडं कळायला लागलं तशी व्यापाराकडं वळली, पण नीताच्या आई-वडिलांना शिक्षणाचं महत्त्व वाटत होतं, ही सगळी भावंडं शिकली. चुलत बहिणी १८वं सरतंय न सरतंय तोवर दोनाचे चार हात करून सासरी गेल्या. त्यामानानं नीताचं लग्न २० व्या वर्षी म्हणजे तसं उशिराच झालं. लग्नानंतर लगेचच सासर-माहेर दोन्हीकडून मुलांसाठी दबाव यायला लागला आणि त्या दबावामुळे असेल किंवा स्वेच्छेने असेल, नीताला दिवस राहिले. माझ्या बरोबरीनं खेळणारी, भांडणारी, रडणारी, चिडणारी, अगदी मारामारीदेखील करणारी नीता आई होणार... त्यानंतर एकेक करून मैत्रिणींची लग्नं होत गेली, त्यांना मुलंही झाली आणि प्रत्येकवेळी मनावरून अगदी तसंच मोरपिस फिरलं. माझ्या चुलत बहिणीला मागच्या वर्षी मुलगा झाला. आमच्या पुढच्या पिढीची सुरुवात.. त्याला जेव्हा मी हातात घेतलं तेव्हा का माहित नाही, पण खूप छान वाटलं. इतकं नाजूक, सुंदर, अनमोल जगात दुसरं काही असूच शकत नाही असं काहीसं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज लिहायला बसले आणि असे कितीतरी प्रसंग डोळ्यासमोर उभे राहिले. काय लिहायचं आणि काय नाही कळेना. मनावरुन मोरपिस पुन्हा फिरायला लागलं आणि पुन्हा अंग शहारलं...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-2870504392514543058?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/2870504392514543058/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=2870504392514543058' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/2870504392514543058'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/2870504392514543058'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2007/02/blog-post.html' title='मनातल्या मोरपिसांची....'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-116916983245127513</id><published>2007-01-18T17:23:00.001-08:00</published><updated>2007-01-19T17:36:55.686-08:00</updated><title type='text'>रंग माझा वेगळा!</title><content type='html'>"निसर्गसौंदर्य" म्हटले की आपल्या डोळयासमोर येतात ते मोठमोठे हिरवेगार डोंगर, त्यावर उतरलेले ढग, त्या डोंगरातून मधूनच कुठेतरी कोसळणारा धबधबा किंवा अथांग पसरलेला समुद्र, फेसाळलेल्या लाटा, क्षितिजावर टेकलेला सूर्य आणि वेगवेगळ्या रंगांनी न्हाऊन निघालेलं आकाश. झाडे, फुले, पाने, पाणी... हे सगळं आपल्याला सुंदर वाटतं. बरोबरच आहे म्हणा.. एखादा उघडाबोडका डोंगर बघून कुणाच्या तोंडून वाह वा निघेल? इतके दिवस माझाही असाच समज होता, पण आमच्या डेथव्हॅलीच्या सहलीनं माझा हा समज अगदी खोटा ठरवला. पहिल्यांदाच वाळवंटातलं सौंदर्य पाहिलं मी.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वाळवंटाचं ते रुप तुमच्यासाठी इथे देते आहे. आहे की नाही ह्याच्या रंग अगदी शब्दशः वेगळा? &lt;a href="http://photos1.blogger.com/x/blogger/3899/2245/1600/121692/MosaicCanyon2.jpg"&gt;&lt;img style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; CURSOR: hand" alt="" src="http://photos1.blogger.com/x/blogger/3899/2245/320/4827/MosaicCanyon2.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;a href="http://photos1.blogger.com/x/blogger/3899/2245/1600/121692/MosaicCanyon2.jpg"&gt;&lt;/a&gt;&lt;a href="http://photos1.blogger.com/x/blogger/3899/2245/1600/121692/MosaicCanyon2.jpg"&gt;&lt;/a&gt;&lt;a href="http://photos1.blogger.com/x/blogger/3899/2245/1600/810811/ArtistDrive8.jpg"&gt;&lt;img style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; CURSOR: hand" alt="" src="http://photos1.blogger.com/x/blogger/3899/2245/320/310871/ArtistDrive8.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt; &lt;a href="http://photos1.blogger.com/x/blogger/3899/2245/1600/12317/GoldenCanyon6.jpg"&gt;&lt;img style="FLOAT: left; MARGIN: 0px 10px 10px 0px; CURSOR: hand" alt="" src="http://photos1.blogger.com/x/blogger/3899/2245/320/2955/GoldenCanyon6.jpg" border="0" /&gt;&lt;/a&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-116916983245127513?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/116916983245127513/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=116916983245127513' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/116916983245127513'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/116916983245127513'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2007/01/blog-post_18.html' title='रंग माझा वेगळा!'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-115698612238172207</id><published>2006-08-30T18:02:00.000-07:00</published><updated>2006-11-10T14:45:15.466-08:00</updated><title type='text'>काय करावं अशा लोकांचं?</title><content type='html'>आज खूप दिवसांनी इकडे परतले. गेले काही दिवस कामाचा व्याप इतका वाढला होता की दुसरं काही करायला वेळच मिळत नव्हता. आज मुद्दाम ठरवून इकडे आले. असो!&lt;br /&gt;मागच्या महिन्यात आम्ही इटलीला जाऊन आलो. रोम, पोंपई, व्हेनिस, मुरानो, फ्लोरेन्स, पिसा अशी कितीतरी ठिकाणं हिंडलो, प्रत्येक गावात वर्षानुवर्ष जतन करुन ठेवलेल्या इमारती बघताना खरंच आश्चर्यचकित व्हायला होत होतं. त्या काळात त्यांचं शास्त्र किती प्रगत होतं ह्याची पहिल्यांदाच जाणीव होत होती. ००७० साली ज्वालामुखीनंतर राखेखाली गेलेले पोम्पई शहर, त्याची रचना बघून त्या रचनाकारांचं कौतुक वाटत होतं. पण तेव्हाच जाणवलं, आपण भारतीय लोक पण तर असेच किंबहुना ह्यापेक्षाही जास्त प्रगत होतो, पण ऐतिहासिक वास्तु, दस्तावेज जतन करून ठेवण्याची आपली वृत्तीच नाही बहुदा. आपले किल्ले, वाडे म्हणजे कचरा करण्यासाठी, आपल्या प्रेमाची जाहिरात कोरून ठेवण्यासाठी, पान-तंबाखू-गुटख्याची पिंक टाकण्यासाठी, दारूच्या बाटल्या फोडण्यासाठी मिळालेली हक्काची जागा वाटते आपल्याला. आपली संस्कृती जतन करणा~या इटालियन लोकांचं तोंड भरुन कौतुक करताना माझ्या देशात चाललेली ही हेळसांड जास्त तीव्रतेनं जाणवली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मी शेंगा खाऊन फोलपाटं तिथेच टाकली नाही म्हणून माझी खिल्ली उडवणारे लोक दुसते कुणी नाही माझे अगदी जवळचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईक आहेत, ते पण so called सुशिक्षित. आपलं घर टापटीप ठेवणारे हे लोक, घरासमोरच्या बागेत मात्र भेळेच्या पुड्या, च्युइंग गम, कोक-पेप्सीच्या बाटल्या टाकून येतात. जर ह्या सुशिक्षित, जग हिंडलेल्या लोकांना शिस्त लावणं आपल्याला जमत नाही तर इतरांबद्दल बोलायलाच नको.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-115698612238172207?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/115698612238172207/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=115698612238172207' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/115698612238172207'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/115698612238172207'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2006/08/blog-post.html' title='काय करावं अशा लोकांचं?'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-114972798353909792</id><published>2006-06-07T17:53:00.000-07:00</published><updated>2006-06-07T17:53:03.573-07:00</updated><title type='text'>गुणवत्तेचे कौतुक का करु नये?</title><content type='html'>गुणवत्ता यादी प्रसिद्ध करावी की नाही ह्यावरची चर्चा अलिकडे वाचनात आली आणि १०वी - १२वी चे दिवस पुन्हा आठवले. शाळेत “गुंड” म्हणून ज्या लोकांना ओळखले जाते, त्यांच्याकडून फारश्या अपेक्षा नाही ठेवल्या जात. मीसुद्धा त्याला अपवाद नव्हते. मी हुशार नव्हते असे नाही, शाळेत पहिल्या पाचात नेहमीच असायचे कारण फारसा अभ्यास न करता ते जमून जायचे. पण पहिला नंबर मिळवण्यासाठी झटण्याची वगैरे माझी कधीच तयारी नव्हती. त्यापेक्षा मित्र-मैत्रिणींबरोबर “टाइम-पास” करणे मला जास्त महत्त्वाचे वाटायचे. आई-बाबा पण मिळालेल्या गुणांवर खूष असायचे, त्यामुळे चौथ्याऐवजी पाचवा क्रमांक मिळण्याचे वाईट वाटावे अशी वेळच आली नाही. दहावीच्या परिक्षेपूर्वी माझ्या वर्गशिक्षिकेने माझ्या आईला  सांगितलेही होते की “तुमची मुलगी हुशार आहे पण गुणवत्ता यादीत येण्यासाठी लागणारी एकाग्रता आणि प्रयत्न करण्याची तयारी मात्र तिच्यात नाही, तेव्हा तुम्ही फारश्या अपेक्षा ठेवू नका.” माझ्या आईला हे ऐकून वाईट वाटले होते ह्यात शंका नाही, तिची चिडचिडही झाली असावी, पण मला खरंच त्याचे काहीच वाटले नाही. पण हे ऐकून एका वर्गमैत्रिणीने केलेल्या कानउघाडणीनंतर मात्र मी अभ्यास करणे खरंच मनावर घेतले. १०वी च्या गुणवत्ता यादीत माझे नाव पाहून सगळ्या शिक्षकांना जबरी धक्का बसला होता. त्यादिवशी माझ्या आई-बाबांच्या चेह~यावर दिसलेले समाधान लाख मोलाचं होतं. तोपर्यंत गुणवत्ता यादी माझ्या दृष्टिनं कधीच इतकी महत्त्वाची नव्हती, पण त्या दिवसानंतर मात्र १२वी ला असेच यश पुन्हा मिळवायचे असे मी मनोमन ठरवून टाकले होते. शाळेत किंवा महाविद्यालयात आजही आपले नाव झळकलेले आहे ही माझ्यासाठी खूप अभिमानाची  गोष्ट आहे. माझ्या बाबांच्या शाळेत मी गेले असताना त्यांचे नाव असेच झळकलेले पाहून माझा ऊर अभिमानानं भरून आला होता, आणखी काही वर्षांनंतर माझ्या मुलांनासुद्धा असाच अभिमान माझ्याबद्दल वाटेल हा विचारच किती सुखद आहे. खरं तर आता मागे वळून पाहिल्यावर १०वी आणि १२वीचे यश खरंच इतके महत्त्वाचे वाटत नाही. पण त्याक्षणी, त्यावेळी ज्या भावना मी अनुभवल्या, जे सुख मी माझ्या कुटुंबियांच्या डोळ्यात पाहिले, ते त्या क्षणापुरते का होईना अनमोल होते. ह्या सगळ्या भावनांच्या अनुभूतीनंतर मी तरी कधीच गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्याला विरोध करणार नाही. ह्याचे तोटे असतीलही, पण जर कुणी कष्टानं यश मिळवले असेल तर त्याचे कौतुक करण्यात गैर काय आहे हे मला तरी कळत नाही आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-114972798353909792?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/114972798353909792/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=114972798353909792' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114972798353909792'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114972798353909792'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2006/06/blog-post.html' title='गुणवत्तेचे कौतुक का करु नये?'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-114850451552349140</id><published>2006-05-24T14:00:00.000-07:00</published><updated>2006-05-24T14:01:55.536-07:00</updated><title type='text'>टाइम मशिन</title><content type='html'>काही दिवसांपूर्वी जुने फोटो बघायची हुक्की आली. लगेच सगळे जुने-पुराणे अल्बम बाहेर काढून मी पसारा मांडून बसले. बालपणी आई-बाबांसमोर केलेली नाटकं, तेव्हाचे टिल्ले-पिल्ले मित्र-मैत्रिणी, शाळेत नाचात मी केलेला कृष्णाचा पार्ट आणि आईने केलेला तो मेक-अप, तो आवडला नाही म्हणून फुरंगटून बसलेली आईची "ती" बाळकृष्ण.. हे आणि त्यानंरची कित्येक ग्यादरिंग, माझ्या भावाचा जन्म, त्याचे लहान असतानाचे फोटो.. (आई ग! कित्ती गोड दिसायचा तो.. आता अगदीच सांडासारखा वाढलाय.) आमचे दोघांचे वाढदिवस, आमच्या ट्रिप्स, आजी-आजोबांची साठी-पंचाहत्तरी, भावाची मुंज, कॊलेजमधले दोस्त लोक, हॊस्टेलवर घातलेले गोंधळ, गोवा, हेद्वी आणि महाबळेश्वरच्या आमच्या ग्रुपच्या ट्रिप्स.. आमचा पहिला valentine's day, लग्न, reception, honeymoon.. काय काय नाही साठलेलं त्या अल्बम्समध्ये!! असं वाटतं माझं सगळं आयुष्य सामावलंय फोटोंच्या छोट्याश्या बॊक्समध्ये! तो उघडला की जणू माझा भूतकाळ समोर उभा ठाकतो, आठवणींवर बसलेली धूळ झटकली जाते आणि पुन्हा जगते मी ते सोनेरी दिवस मनातल्या मनात.&lt;br /&gt;किती मोठी देणगी दिली आहे ना विज्ञानानं आपल्याला. It is kind of a Time Machine, isn't it? गतायुष्याची सैर करायची संधी किती सुलभ आहे आपल्यासाठी.. हो ना?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-114850451552349140?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/114850451552349140/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=114850451552349140' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114850451552349140'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114850451552349140'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2006/05/blog-post_24.html' title='टाइम मशिन'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-114670420484585076</id><published>2006-05-03T17:21:00.000-07:00</published><updated>2006-05-03T17:56:44.866-07:00</updated><title type='text'>श्रद्धांजली</title><content type='html'>प्रमोद महाजन गेले. एका उमद्या नेत्याचा असा करुण अंत झाला. आज ना उद्या भारताच्या पंतप्रधानपदावर महाजनांच्या रुपात एक मराठी माणूस आरुढ होईल अशी जी आशा मराठी मनांत होती तिला तिलांजली मिळाली. भाजपासाठी तर हा खूपच मोठा धक्का आहे. पक्षाची धुरा लिलया पेलणारा, शिवसेनेबरोबर युती करण्याचा मुत्सद्दी निर्णय घेणारा आणि महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच विधानसभेवर भगवा फडकवण्यात यशस्वी झालेला हा  तरुण नेता आज भाजपाने गमावला. महाजनांचा मृत्यु हा त्यांच्या कुटुंबियांसाठी दुःखद आहेच, पण लाखो-करोडो भारतीयांसाठी आणि भारतीय राजकारणासाठी पण हा मोठा धक्का आहे.&lt;br /&gt;त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-114670420484585076?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/114670420484585076/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=114670420484585076' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114670420484585076'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114670420484585076'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2006/05/blog-post.html' title='श्रद्धांजली'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-114626988329713259</id><published>2006-04-28T16:45:00.000-07:00</published><updated>2006-04-28T17:18:03.306-07:00</updated><title type='text'>आरक्षण...कशासाठी?</title><content type='html'>मी अमेरिकेत आले तेव्हाच ठरवलं होतं, आपण आपल्या देशात परत जायचं. अजूनही विचार पक्का आहे, पण मग अशा काही बातम्या वाचल्या की वाटतं आपला निर्णय चुकीचा तर ठरणार नाही ना? "ब्राम्हणद्वेष" जिथे एखाद्या धर्माचा पाया असू शकतो अशा देशात मी ब्राम्हण म्हणून जन्मले. मी शाळेत असताना अधूनमधून "बामण" म्हणून चिडवाचिडवी व्हायची, पण त्याचा त्रास व्हावा इतक्या प्रमाणात नाही. पण उद्या माझ्या मुलाबाळांना "ब्राम्हण" म्हणून वाईट वागणूक मिळणार नाही ह्याची खात्री देऊ शकतं कुणी? नाही.. त्यांना equal opportunities मिळतील ह्याची खात्री आहे? नाही... त्यांच्यावर जातीच्या राजकारणामुळे अन्याय होणार नाही ह्याची खात्री आहे? नाही.. किंबहुना तसा अन्याय होण्याचीच शक्यता जास्त आहे. मग मी आणि माझ्यासारख्या हजारो &lt;strong&gt;&lt;em&gt;उच्चवर्णीय&lt;/em&gt;&lt;/strong&gt; अनिवासी भारतीयांनी परत जाण्याचा निर्णय बदलायचा की काय? &lt;strong&gt;&lt;em&gt;&lt;/em&gt;&lt;/strong&gt;&lt;br /&gt;माझा विरोध आरक्षणाला नाही. पण जातीच्या राजकारणाला नक्कीच आहे. द्या ना आरक्षण, पण गरिबांना द्या, गरजूंना द्या. त्यांची जात नका बघू. कुवत बघा. आज गरीब उच्चवर्णिय विद्यार्थ्याजवळ काय पर्याय आहेत?&lt;br /&gt;१) आपल्या पालकांना कर्ज काढायला लावून एखाद्या private college मध्ये जाऊन शिकायचं, शिक्षण पूर्ण झालं की नोकरीसाठी पुन्हा टाचा घासायच्या आणि त्यातून निष्पन्न काय होणार, तर त्याची जागा एखाद्या SC/ST/BC/OBC उमेदवाराला मिळेल.&lt;br /&gt;२) आपली कुवत असूनही उच्च शिक्षणाला राम-राम ठोकायचा आणि गरिबीच्या गर्तेत खोल-खोल बुडत जायचं.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज आपण मारे आरडा-ओरडा करतो आहे "India Shining" चा. पण प्रत्येक क्षेत्रात reservations झाले, तर राहील हीच परिस्थिती? Will we be able to maintain quality of work we promise today? मग कोण गुंतवेल पैसा भारतात? काय परिणाम होईल ह्याचा आपल्या अर्थव्यवस्थेवर? प्रश्न बरेच आहेत.. पण उत्तर शोधण्याचा प्रयत्नसुद्धा करणार नाहीत आपले राजकारणी लोक. कारण त्यांना vote bank मिळवायच्या आहेत आणि त्यासाठी जातीच्या राजकारणापेक्षा सोपा मार्ग तो कुठला? "Divide and Rule" ची नीती आणखी किती दिवस चालवणार हे लोक? देशाच्या ठिक~या केल्याशिवाय स्वस्थता मिळणार नाही बहुदा ह्यांना. आपण कितीही आरडाओरडा केला तरी हे लोक आपलं मन मानेल तेच करणार. चूक आपलीच आहे म्हणा, आपणच तर दिलाय माकडांच्या हातात कोलीत मतं देऊन.&lt;br /&gt;&lt;br /&gt;चला... आपण ह्या सगळ्याकडं कानाडोळा करायला शिकू या. चांगलं ते घेऊन वाईट सोडून देऊ या... चला, सगळे एकसाथ म्हणा बघू "माझा भारत महान!!!!"&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-114626988329713259?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/114626988329713259/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=114626988329713259' title='7 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114626988329713259'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114626988329713259'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2006/04/blog-post_28.html' title='आरक्षण...कशासाठी?'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>7</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-114566863018417426</id><published>2006-04-21T18:17:00.000-07:00</published><updated>2006-04-27T18:33:44.553-07:00</updated><title type='text'>अशी पाखरे येती...</title><content type='html'>वय वर्ष ४&lt;br /&gt;माझे काका, काकू, चुलत भावंडं काकांची बदली झाल्यामुळे दुस~या गावाला रहायला गेले. माझी चुलत बहिण...माझी मैत्रिण आणि माझा चुलत भाऊ... आमच्या दोघींचाही लाडोबा, अचानक एक दिवस दोघेही निघून गेले. जाताना आमच्या वेड्या खेळांना, क्षुल्लक कारणावरुन होणा~या अगदी कडाक्याच्या भांडणांना, मग होणा~या समेटीला, एकाच ताटातल्या जेवणांना, एकमेकींचा हात धरून दसरा-संक्रांतीला हिंडलेल्या घरांना मागे ठेवून गेले. मी ८वी-९वीत असताना ते परत आले.. कायमचे. पण, का कोण जाणे आमच्या नात्यात मात्र कायमचा दुरावा राहिला.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वय वर्ष ७&lt;br /&gt;आमच्या घरासमोरची मावशी.. तिला २ मुलं होती, यदु आणि परु... माझ्यासाठी यदु-परु दादा. मी बरेचदा तिच्याकडे जायचे.. गल्लीत फारशा मुली नव्हत्या, त्यामुळे यदु-परुदादा मला त्यांच्याबरोबर खेळायला न्यायचे. त्यावेळी मला स्वयंपाक करायची फार हौस होती. आजी काही शेगडीजवळ फिरकू द्यायची नाही. मग माझा मोर्चा मावशीकडे वळायचा. मावशी कधी कणकेचा गोळा द्यायची लाटायला, तर कधी निवडलेले तांदूळ परत निवडायला. मला आठवतंय एकदा दादांनी मला आरामखुर्चीतली दांडी काढून आणायला सांगितली होती, मी वेडिनं ती काढून त्यांना नेऊन दिली, थोड्या वेळानं त्यांचे बाबा खुर्चीत बसले आणि जोरदार आपटले. मग आम्ही किती आणि कोणत्या शिव्या खाल्ल्या ते इथे न लिहिलेलेच बरे :) त्यांनी काही दिवसांनी नवे घर बांधले आणि तिकडे रहायला गेले. त्यानंतरही काही दिवस हळदी-कुंकू, दसरा, दिवाळीला जाणं होत असे. आमचं एकमेकांकडं जाणं-येणं कधी थांबलं आता आठवत पण नाही. पण मी ११वीला कॊलेजात गेले आणि पहिल्याच दिवशी परुदादा दिसला, पण आम्ही दोघेही एकमेकांशी बोललो नाही... भीड असेल किंवा आणखी काही... पण मी ओळखायचे तो परुदादा मात्र मला त्यानंतर कधीच भेटला नाही.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वय वर्ष १५&lt;br /&gt;१०वी झाले.. शाळा सुटली... सगळ्या वर्गमित्र-मैत्रिणींची साथ सुटली. काहीजण कॊलेजात बरोबर होते.. पण काहीचजण. २-३ वर्षानंतर आम्ही आमच्या वर्गाचे संमेलन आयोजित केले होते, सगळेजण आवर्जून आले होते. २-३ वर्षानंतर एकमेकांना भेटून सगळे इतके खूष होते ना... ह्यापुढे दर २ वर्षानी आपण असा कार्यक्रम करायचा असा प्रस्ताव पास करून आम्ही सगळे त्यादिवशी त्या हॊटेलातून बाहेर पडलो, परत कधीही न भेटण्यासाठी. आज जवळपास सगळ्या वर्गमित्र-मैत्रिणींची लग्नं झाली आहेत, कित्येकांना मुलं ही झाली आहेत. ज्या २-४ टाळक्यांशी अजून संपर्क आहे त्यांच्याकडून कधीकधी काही खबरी मिळत असतात. शाळेत गेलं की शिक्षकांशी, तिथल्या इतर स्टाफशी भेटी होतात. पण आता आमच्यावेळचे बरेच लोक निवृत्त झाले आहेत. दरवेळी भारतात जाताना ठरवते की ह्यावेळी शक्य तितक्या लोकांना जमवून छोटंसं गेट-टू करायचं. पण आजवर योग आला नाही. नाही म्हणायला माझ्या लग्नाच्यावेळी माझे सगळे शिक्षक आणि काही दोस्त मंडळी आली होती... that is the closest I have been to arranging our get together so far.&lt;br /&gt;&lt;br /&gt;वय वर्ष १७&lt;br /&gt;विभा.. माझी बालमैत्रिण... माझी वर्गमैत्रिण...&lt;br /&gt;मी, विभा आणि शालू... शाळेत एकत्र होतो... क्लासमध्ये एकत्र.. कॊलेजात पण एकत्र. तिच्या आईला का कोण जाणे आमची मैत्री खुपायची. काही क्षुल्लक वाद.. काही गैरसमज.. काही चुका... माझी चूक होती की मी आईपासून कधीच काही लपवलं नाही, तिच्या आईसमोर पण खरं तेच बोलले.. विभाची चूक होती की तिनं आईपासून काही गोष्टी लपवल्या.. शालूची चूक होती की तिनं आपली बाजू कधी मांडलीच नाही... आणि आमच्या ह्या चुकांची शिक्षा... आम्ही एक चांगली सखी कायमची हरवली.&lt;br /&gt;मला आठवतं... दहावीला असताना मी अभ्यासच करायचे नाही.. अजून परिक्षेला वेळ आहे.. उद्या करू.. परवा करू.. असं करत करत परिक्षा २ महिन्यांवर येऊन ठेपली तरी माझी अभ्यासाची लक्षणं नव्हती. एक दिवस वर्गात काही तरी प्रश्न विचारला सरांनी आणि मला उत्तर आलं नाही. मला आठवतं विभानं अस्सं धारेवर धरलं होतं मला... त्यानंतर तिनं माझी जागा बदलवून घेतली बाईना सांगून आणि मी तिच्या शेजारी बसायला लागले... तिच्या सहवासाचा परिणाम असेल किंवा तिची धडपड बघून मला स्वतःची लाज वाटली म्हणून असेल, पण मी अभ्यास करायला लागले. माझा बोर्डात १७ वा क्रमांक आला होता ही बातमी पण मला तिच्याकडूनच मिळाली... ती पण बोर्डात आली होती, शालू पण... १२ वी ला ती बोर्डात आली नव्हती, मला माहित होतं तिला खूप वाईट वाटलंय ते, पण माझं आणि शालूचं अभिनंदन करणारी ती पहिली व्यक्ति होती. आम्ही तिघींनी एकत्र घालवलेले ते दिवस म्हणजे माझ्या आयुष्यातला अमूल्य ठेवा आहे. आजही तिच्या वाढदिवसाला तिची न चुकता आठवण येते. मनातल्या मनातच मी तिचं अभिनंदन करते. ती आज माझ्यासमोर आली तर मी तिला माझ्या सगळ्या भावना बोलून दाखवू शकेन की नाही कोण जाणे, पण जर ती आजही माझी सखी, माझी विभा असेल तर मला काही बोलून दाखवायची गरजच पडणार नाही ह्याची मात्र मला खात्री आहे...&lt;br /&gt;&lt;br /&gt;वय वर्ष २०&lt;br /&gt;इंजिनीअरिंगचं शेवटचं वर्ष..&lt;br /&gt;घर सोडून पहिल्यांदा मी जेव्हा त्या कॊलेजात गेले होते तेव्हा खूप धाकधूक होती मनात.. कसं होणार आपलं... कसे राहणार आपण आई-बाबांना सोडून? पहिल्यादिवशी माझ्यासारखेच बावरलेले कितीतरी चेहरे दिसले मला माझ्या आजूबाजूला... हळूहळू सगळ्यांशी ओळखी होत गेल्या आणि नवीन मित्र-मैत्रिणी मिळत गेले. जीवाभावाच्या रुपा (रूम पार्टनर) मिळाल्या... जीवापाड जपणारे मित्र-मैत्रिणी भेटले... माझ्यावर जीव ओवाळून टाकणारा माझा "सखा" पण तर मला तिथेच भेटला... सुट्टीला घरी गेलो तरी दिवसाआड गप्पा मारल्याशिवाय चैन पडायची नाही आम्हाला. ज्यादिवशी ते कॊलेज सोडलं...खूप रडलो आम्ही सगळे... घराबाहेरचं आमचं घर कायमचं सुटलं होतं त्या दिवशी.. एक कुटुंबच तर होतो आम्ही... आमचं रक्ताचं नातं नव्हतं, पण मनं जुळली होती... ते ऋणानुबंध मनात जपतो आहे आजही...&lt;br /&gt;&lt;br /&gt;&lt;br /&gt;वय वर्ष २१&lt;br /&gt;साडे तीन महिन्याच्या नोकरीनंतर इन्फोसिस सोडली. फक्त साडे तीन महिने होते मी तिथे, पण जसं पहिलं प्रेम माणूस कधीच विसरत नाही, तशीच बहुदा पहिली नोकरीसुद्धा विसरत नसावा. निदान मी तरी नाही विसरू शकले. कदाचित मला भेटलेल्या दोस्त मंडळींची कृपा असेल, त्यांनी मला ते दिवस कधी विसरूच नाही दिले. अमेरिकेत यायला ६ महिने बाकी होते, काही काम न करता घरी बसणे अगदी अशक्य होतं. एक दिवस माझ्या मित्राशी “नशिब वि. प्रयत्न” असा वाद सुरू होता, मी अर्थातच प्रतत्नांची बाजू घेत होते. आम्ही अगदी हमरीतुमरीवर येऊन भांडत होतो आणि तेव्हा तो म्हणाला, इतका विश्वास आहे ना तुला प्रयत्नांवर तर एक challenge देतो, तू १ महिन्यात infyमध्ये नोकरी मिळवून दाखव. मी पण इरेला पेटले होते. तेव्हा infy म्हणजे एकदम hot favourite होतं, त्या घटनेच्या २२ व्या दिवशी इन्फोसिसचं appointment letter माझ्या हातात होतं. त्या दिवशी आम्ही वाद घातला नसता तर कदाचित इन्फोसिसमधले ते सोनेरी क्षण माझ्या वाट्याला आले नसते. ३ महिन्यांचं training होतं आमचं इन्फोसिसमध्ये. ते संपले, काम नुकतेच सुरू झालं होतं आणि माझी तिथून निघण्याची वेळ आली. त्या ३ महिन्यात आमच्या batch मधल्या लोकांशी इतकी छान मैत्री झाली होती, शिवाय पैसे मिळवण्याची आणि ते मित्र-मैत्रिणींबरोबर मस्ती करत खर्च करण्याची इतकी सवयही झाली होती कि ते सगळं सोडून अमेरिकेला यावं की नाही असा विचार मनात कित्येकदा येऊन गेला. पण बाबांच्या स्वप्नपूर्तीसाठी मला इथे येऊन MS करायचंच होतं, त्यांना पैशाच्या चणचणीमुळे जे करता आलं नाही ते मला करायचं होतं, त्यामुळे त्या दोस्त मंडळींना, त्या office ला, तिथल्या गोड आठवणींना कायमचा राम-राम ठोकून मी पुणे सोडलं. आजही त्या batchच्या काही लोकांशी संपर्क होतो, वाटतं साडे तीन महिन्याची दोस्ती, आज इतके दिवस टिकून आहे, काय कारण असावं आम्ही इतके जवळ येण्याचं? उत्तर मलाही माहित नाही… पण त्यांचं माझ्या आयुष्यात असणं खूप सुखद आहे हे नक्की!&lt;br /&gt;&lt;br /&gt;वय वर्ष २४&lt;br /&gt;MS पूर्ण करुन मी नोकरीसाठी ते गाव सोडलं.&lt;br /&gt;मी तिथे आले तेव्हा किती बावरले होते. नवीन देश, नवी भाषा, नवे लोक… आपलं असं काहीच नव्हतं. वाटत होतं नक्की योग्य निर्णय घेतला ना मी इथे येऊन? घरची आठवण येत होती, इथे आपला निभाव कसा लागणार अशी भितीसुद्धा वाटत होती.&lt;br /&gt;मला न्यायला एअरपोर्टवर आमच्या univचे काहि देसी लोक आले होते. त्यांनी आमची राहण्याची व्यवस्था तिथल्या senior मुलींच्या घरी केली. त्यांनी इतकी काळजी घेतली आमची, की वाटलं ह्यांचं नि आपलं जन्मजन्मांतरीचं नातं असावं. तिथल्या माझ्या रु.पा., माझे इतर मित्र-मैत्रिणी, आम्ही सगळेच घरापासून दूर आपले लोक शोधत होतो, मूळापासून उपटलेल्या झाडासारखी काहिशी अवस्था होती, नवीन जागी रुजायला आपलेपणाचं खत-पाणी हवं होतं, आधार हवा होता फांद्यांना वर चढायला, आणि तो आम्हाला मुबलक मिळाला एकमेकांकडून… मैत्रीच्या रुपानं… कितीतरी चांगले-वाईट क्षण share केले आम्ही, कित्येकदा खांदा दिला एकमेकांना रडण्यासाठी, कित्येकदा celebrateही केल्या एकमेकांच्या achievements. मी काय, आम्ही सर्वांनीच ते गाव एक-एक करुन सोडलं, ते तर विधिलिखित होतं, ज्या दिवशी त्या गावात आम्ही पहिलं पाऊल ठेवलं होतं तेव्हाच माहित होतं की आम्ही काही दिवसांचा पाडाव टाकतो आहे इथे, पण तरी आमची मूळं आमच्याही नकळत तिथे खोलवर रुजली, त्याचं काय? “Out of sight, out of mind”.. ऐकली आहे ही म्हण कधी? खरी आहे.. मी अनुभवली आहे.. मैत्री करणं सोपं असतं, टिकवणं अवघड… आणि आपल्यातलं अंतर जसं वाढत जातं तसं ते आणखी अवघड होत जातं. पण असेही काही लोक असतात जे अशा परिस्थितीतही मैत्री टिकवून ठेवतात.. माझ्या सुदैवानं मला असेही लोक भेटले आहेत and I am happy I have them in my life.&lt;br /&gt;&lt;br /&gt;आज...&lt;br /&gt;पुढच्या महिन्यात माझी एक खूप लाडकी मैत्रिण आमचं गाव सोडून जाणार आहे, तिच्या नव~याला टेक्सासमध्ये नोकरी मिळाली आहे. इथे आलो तेव्हा ओळखीचं असं कुणीच नव्हतं. मराठी मंडळ, मायबोली वगैरेंच्या कृपेनं काही मराठी लोक भेटले, सगळे साधारण एकाच वयाचे होतो, wave lengths जुळल्या आणि मैत्री फुलत गेली. मग सणांना भेटणं, एकत्र हळदी-कुंकवासारखे कार्यक्रम करणं, shoppingला जाणं, girls night outs करणं, trekking, dining out असं करत करत कधी सख्ख्या मैत्रिणी झालो कळलं पण नाही. आज पुन्हा त्या थव्यातली २ पाखरं उडून जातील... नवीन थव्याला जाऊन मिळतील, पण आमच्या थव्यातल्या त्यांच्या जागा कायम रिक्त राहतील.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-114566863018417426?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/114566863018417426/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=114566863018417426' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114566863018417426'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114566863018417426'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2006/04/blog-post_21.html' title='अशी पाखरे येती...'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-114497630814617504</id><published>2006-04-13T16:52:00.000-07:00</published><updated>2006-04-13T17:58:28.160-07:00</updated><title type='text'>दुवा</title><content type='html'>परवा आजी गेली. अगदी अचानकच. फारशी आजारी होती असंही नाही, पाय दुखत होते म्हणून दवाखान्यात नेलं आणि काही निदान होण्यापूर्वीच तीव्र झटका येऊन ती गेलीसुद्धा. मी एका मीटिंगमध्ये होते, ते पण शिकागोमध्ये, फोन बंद होता, सकाळी ९ च्या आसपास फोन आला होता, पण निरोप मिळाला तेव्हा संध्याकाळचे ५ वाजले होते. अर्थात आधी निरोप मिळाला असता तरी मी काही करु शकले असते असे नाही म्हणा. लगेच ७ च्या विमानानं घरी यायला निघायचं होतं. भारतात खूप रात्र असल्यामुळे लगेच फोन करणे ही शक्य नव्हते. घरी पोचले तेव्हा रात्रीचे बारा वाजले होते. तेव्हा फोन केला. आजी गेल्याला १८ तास होऊन गेल्यावर.. जागेतल्या, वेळेतल्या अंतरामुळे किती हतबल होतो ना माणूस? फोनवर आजोबांशी बोलले, तर त्यांनी विचारलं "तुला बातमी मिळाली ना? आता मला भेटायला येशील ना गं?" काय उत्तर होतं माझ्याकडं ह्या प्रश्नाचं? "नाही येऊ शकत" असं सांगून त्यांचं मन दुखवायचं? की "येईन हा" असं खोटं आश्वासन द्यायचं? माझ्या तोंडून शब्दच फुटेनात. आईच्या लक्षात आलं की काय कोण जाणे, पण तिनं आजोबांकडून फोन काढून घेतला. पण निःशब्दतेतले ते ४ क्षण खूप त्रासदायक होते. इतकी हतबलता, इतका दुबळेपणा मला कधीच जाणवला नव्हता. माझ्या आजोबांचं आयुष्य एका क्षणात रितं झालं होतं, ६५ वर्षांचा संसार संपुष्टात आला होता, त्यांची लाडकी नात त्यांचं दुःख वाटायला येईल एवढीच त्यांची अपेक्षा होती, पण ती येऊ शकत नव्हती कारण... कारण आपल्या स्वप्नांच्या मागे धावताना ती आपलं घर, आपली माणसं जगाच्या दुस~या टोकाला सोडून आली होती. "काय कमावलं आणि काय गमावलं" हे द्वंद्व इतर लाखो अनिवासी भारतीयांप्रमाणे माझ्या मनातही बरेचदा चालतं. चालत राहणार. पण पायात इतक्या बेड्या मी माझ्या हातानं अडकवून घेतल्या आहेत की पाशमुक्त व्हायला काही काळ जाईलच. परत जायचंच आहे, हा निर्णय बदलणारही नाही. पण म्हणतात ना, वेळ यावी लागते, ती वेळ अजून आलेली नाही हे नक्की. ती वेळ येण्यापूर्वी माझ्या आजीची जाण्याची वेळ आली हे दुर्दैव.. पण ती जाण्यापूर्वी काही दिवसच मी तिला भेटले होते, अगदी २-३ महिन्यापूर्वीच.. मागच्या वर्षीच आमची चक्कर झाली होती भारतात, पण तरिही ह्यावर्षी पुन्हा जायचं ठरवलं आम्ही अचानकच. कदाचित तिला भेटणं माझ्या नशिबात असावं.. काल आम्ही भारतात असतानाचे फोटो बघत होते, आजी-आजोबांबरोबरचा आमचा फोटो.. पुन्हा कधीच मी तिला बघणार नाही, ही भावना भयंकर वाटली मला त्याक्षणी, पण तेच सत्य आहे, कटू असले तरिही... तिचे सगळ्यांशी ऋणानुबंध इथवरच होते, ते तोडून ती निघून गेली. आजोबांना एकटं सोडून गेली.. पण आठवणी मागे ठेऊन गेली. आजोळचे आजी-आजोबा तर केव्हाच गेले होते, आता त्या पिढीतला एकच दुवा शिल्लक आहे माझ्या आजोबांच्या रुपात, क्षीण आहे, पण आहे. आणि तो असणे किती आनंददायी आहे ते आज जाणवते आहे, आजी गेल्यावर, एक दुवा निखळल्यावर.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-114497630814617504?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/114497630814617504/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=114497630814617504' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114497630814617504'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114497630814617504'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2006/04/blog-post.html' title='दुवा'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-114324395475453554</id><published>2006-03-24T15:08:00.000-08:00</published><updated>2006-03-24T15:45:54.773-08:00</updated><title type='text'>चाणक्य</title><content type='html'>काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर “चाणक्य” नावाची मालिका यायची. ह्यावेळी भारतात गेलो होतो तेव्हा त्या मालिकेचा VCD संच आणला. हल्ली रोज रात्री त्याचा एक भाग तरी बघूनच झोपतो. खूपच चांगली मालिका आहे. प्रकाश द्विवेदींनी बराच अभ्यास केल्याचे जाणवते.&lt;br /&gt;&lt;br /&gt;सध्या आम्ही अलेक्झांडरच्या आक्रमणाचा भाग बघतो आहे. तो बघताना जाणवलं, आपण १८५७ च्या स्वातंत्र्यसंग्रामाला भारताच्या इतिहासातला पहिला स्वातंत्र्य लढा म्हणतो, पण पहिला स्वातंत्र्यलढा तर त्याच्या जवळपास २००० वर्षांपूर्वी लढला गेला होता. अलेक्झांडरसमोर राज्यलालसेने आंधळ्या झालेल्या गांधारच्या आंभिराजाने समर्पण केले, शौर्याने लढूनही पुरु राजा हरला कारण त्याच्या मदतीला इतर कुठलेही राजे पुढे झाले नाही, ह्या पराभवानंतर पुरुनेदेखील भारत पादाक्रांत करण्यात अलेक्झांडरची मदत केली. आपले सैन्यबळ त्याला दिले. उत्तरेत अलेक्झांडरने धूमाकूळ घातला होता आणि त्याच्या प्रतिकार करण्याची ताकद एकाही राज्यात नव्हती. एकत्र येऊन प्रतिकार करण्याची त्यांची इच्छा नव्हती. प्रत्येकाने स्वतंत्रपणे लढा दिला आणि हरले, सामूहिक प्रयत्नांची गरज होती पण तसे प्रयत्न अहंकारात बुडालेल्या ह्या शूर राजांनी केलेच नाहीत. पण हे सगळे सुरू असताना, तक्षशिलेचा एक सामान्य शिक्षक, आपल्याला काय त्याचे म्हणून शांत बसला नाही. त्याने संपूर्ण भारत एक राष्ट्र म्हणून संघटित करण्याचा विडा उचलला. लोकांच्या मनात राष्ट्राभिमान जागवला. स्वातंत्र्याचे महत्व त्यांना पटवून दिले. अंतर्गत संघर्षात आपण आपलाच घात कसा करतो आहोत ते राजांना दाखवून दिले. सामान्य शिक्षकाकडूनही उच्च ध्येयाने आणि प्रयत्नांनी काय घडू शकते ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे चाणक्य. त्याच्या ह्या प्रयत्नांनी संपूर्ण उत्तराचल प्रदेश पेटून उठला, यवनांना सळो की पळो करून सोडले ह्या ब्रह्मचारी स्वातंत्र्यसैनिकांनी. त्यांनी उत्तराचल यवनांच्या दास्यातून मुक्त केला. पण ह्या लढ्याचा साधा उल्लेखदेखील नाही आपल्या इतिहासाच्या अभ्यासक्रमात. चाणक्य म्हणजे “कुटील राजनीतिज्ञ” इतकीच माहिती होती मला. पुरू म्हणजे “मला राजासारखे वागव” असे अलेक्झांडरपुढे अभिमानाने सांगणारा राजा हेच ज्ञान मिळाले होते मला माझ्या पुस्तकातून. पण त्याच्या ह्या वागण्यासाठी त्याला धिक्कारणारी, ह्यापेक्षा तू अलेक्झांडरला “मला ह्या मातृभूमीच्या रक्षणासाठी लढणा~या सैनिकासारखा वागव” असे उत्तर दिले असते तर माझ्या वडिलांचा मला जास्त अभिमान वाटला असता असे म्हणणारी कल्याणी मात्र त्या पुस्तकांच्या पानांतून कधी भेटलीच नाही. आजही आपण मराठी, गुजराथी, तामिळ, तेलुगु, बिहारी, पंजाबी म्हणून ओळख करून देतो स्वतःची. ऐक्य नाही आहे आपल्यातच. पण ह्या गोष्टीचा धोका ओळखून २००० वर्षांपूर्वी ज्या व्यक्तीने राष्ट्र उभारणीचे कार्य हाती घेतले होते आणि ते तडीलाही नेले त्याचा मात्र साधा उल्लेखही नाही आपल्या इतिहासात. प्रत्येकवेळी ती मालिका बघताना वाटत रहातं, आजही अगदी तशीच परिस्थिती आहे, राष्ट्र संघटित करणा~या चाणक्याची आजही गरज आहे, पण असे निःस्वार्थी, द्रष्टे लोक राष्ट्राच्या इतिहासात क्वचितच जन्माला येतात. त्यांच्यात होते ते सामर्थ्य आपल्यात नाही, तसा स्वार्थत्याग करण्याची आपली तयारीही नाही, पण निदान आपल्या पुढच्या पिढीला त्यांच्या कार्याची ओळख करून देण्याची जबाबदारी तरी निभावू शकतोच की आपण.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-114324395475453554?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/114324395475453554/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=114324395475453554' title='2 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114324395475453554'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114324395475453554'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2006/03/blog-post_24.html' title='चाणक्य'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>2</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-114288592105495048</id><published>2006-03-20T11:56:00.000-08:00</published><updated>2006-03-20T14:54:27.230-08:00</updated><title type='text'>अमेरिकन रंगपंचमी</title><content type='html'>साल २००१, रंगपंचमीचा दिवस&lt;br /&gt;भारत सोडल्यानंतरची ही पहिलीच रंगपंचमी. भारतातल्या रंगपंचमीच्या आठवणी अजून ताज्याच होत्या. त्यामुळे रंग खेळण्याची खूपच उर्मी होती. सगळेच विद्यार्थी, त्यामुळे उत्साह ओसंडून वाहत होता. त्यात एका मित्राची बहिण नेमकी होळीदरम्यान अमेरिकेला आली आणि तिच्याबरोबर आमचे रंगही आले. होळीच्या दिवशी आम्ही ठरल्याप्रमाणे काही मित्रांच्या घरी (जे स्वतःला स्टाईल बॉईज़ म्हणवत, आपण हवं तर त्यांना SB म्हणू) जरा लवकरच जमलो. मी आणि माझ्या २ रु.पा. आणि हे ४ SB, आम्ही सगळा कार्यक्रम ठरवण्यात आघाडीवर होतो, त्यामुळे स्वयंपाकाची जबाबदारी आमच्यावरच होती. आम्ही पोहोचेपर्यंत Aने बराचसा स्वयंपाक केलाच होता. मालपुआ, छोले, पु~या, मसाले भात... म्हणजे एकूण जेवणाची ऐष होती. हळूहळू लोक जमायला लागले आणि रंग खेळायला सुरूवात झाली. पार्कींग लॉटमध्ये आम्ही २-३ तास अगदी धुमाकूळ घातला. सगळेजण रंगले होते. काही अमेरिकन मित्रमैत्रिणीसुद्धा संकोचत का होईना पण त्या गोंधळात सामील झाले होते, समोरच्या सोरोरोटीतून काही मुली अध्येमध्ये डोकावून बघत होत्या. थोडक्यात भारतात जशी जोरदार चाललेली असते ना रंगपंचमी अगदी तशीच ती इथेही सुरू होती. सगळे रंगले होते, भिजले होते, त्याच अवस्थेत जेवण करून आम्ही पांगलो. पण खरी गंमत तर ह्यानंतरच सुरू झाली.&lt;br /&gt;संध्याकाळी आपार्टमेंटचा मॅनेजर उगवला. सगळा पार्किंग लॉट रंगलेला होता, जिन्याच्या आसपासही रंग दिसत होता. तो भलताच उखडला. त्याने SBsना धारेवर धरले. दुस~या दिवशी सकाळीच तो नुकसानीचे estimates घेऊन आला. पार्कींगमध्ये लॉट पाडताना आखलेल्या २ रेषा रंगल्या होत्या. त्या रंगवणं भाग होतं, त्या रंगवल्या की त्या आणि इतर रेषा वेगळ्या दिसणार म्हणून पूर्ण लॉट रंगवावा लागणार होता (अमेरिकेत सगळं नियमाप्रमाणं असतं ना, कदाचित रंगाबाबतही काही नियम असतील, आपल्या भारतात तर कुणी लक्षही दिलं नसतं. जय भारत!!). पार्कींगजवळच्या एका भिंतीवर रंगाचे शितोंडे उडले होते, म्हणून पूर्ण बिल्डींग आणि जो न्याय पार्कींगच्या रेषांना तोच इथे, म्हणून कॉम्प्लेक्समधल्या सगळ्या इमारती रंगवायच्या होत्या, शिवाय जिन्यातले रेलिंग, अपार्ट्मेंटचा आतला भाग, सगळं मिळून १५-१८ हजाराचं estimate होतं. हा आकडा ऐकून भोवळ येणंच बाकी राहिलं होतं. थोडक्यात आमची चांगलीच जिरली होती. विद्यार्थी असताना इतके पैसे जमवणं अशक्य होतं. पण काहीतरी मार्ग काढणं भाग होतं. हे सगळं स्वच्छ झालं असतं तर आमची सुटका झाली असती. म्हणून k-martमधून खूप सारे cleaning supplies आणले आणि SBs कामाला लागले. आमचं सगळ्यांचं नशिब थोर, आम्ही वापरलेला रंग म्हणजे साधा गुलाल होता, थोडी घासाघाशी केल्यावर तो निघाला आणि आम्ही सुटकेचा निःश्वास टाकला. पण तेव्हापासून मात्र आम्ही कानाला खडा लावला. त्यानंतर दरवर्षी रंगपंचमी आली आणि तशीच कोरडी निघूनही गेली.&lt;br /&gt;&lt;br /&gt;साल २००६, रंगपंचमीचा दिवस&lt;br /&gt;ह्यावर्षी आमच्या मराठी मंडळानं रंगपंचमीचा कार्यक्रम ठरवला होता. थोडी थंडी असल्यामुळं जावं की न जावं ठरत नव्हतं. पण रंगपंचमीचा सण साजरा करायला मिळणार, रंगायला मिळणार म्हटल्यावर मात्र रहावलं नाही. आम्ही तसे थोडे उशिराच पोचलो, बरेच लोक जमले होते, एकाचाही चेहरा ओळखायला येत नव्हता. तिथे पोचल्याक्षणी आम्हीही तसेच रंगवले गेलो. तासभर रंगात खेळून घरी परत आलो.&lt;br /&gt;&lt;br /&gt;परत आल्यावर रंग धुताना जाणवलं मला रंग जाईल ना ह्याची खूप चिंता वाटत होती. लहान असताना रंग गेला तर मी पुन्हा हात रंगात घालायचे. शाळेत रंगलेले हात आणि चेहरा घेऊन जाणं मला खूप आवडायचं. २ आंघोळीनंतरही रंग गेला नाही, म्हणजे मी किती मजा केली असेल बघा, असं मित्र-मैत्रिणींना सांगताना अभिमान वाटायचा आणि आता, रंग गेला नाही तर ऑफिसात लोक काय म्हणतील ह्याची चिंता सतावत होती. नखाचा रंग गेला नाही म्हणून बाजारात भाजी घेताना मी हात लपवत होते. का कोण जाणे, पण रंगपंचमीची मजा पूर्वीसारखी नाही आली. अर्थात रंगात भिजताना तो तास-दिड तास मी भान हरपले होते. पण नंतर इतक्या काळज्या होत्या की काय गरज होती रंगात जायची असं वाटून गेलं. अशी कशी बदलले मी? मला रंगांचं वावडं झालं... छे!!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-114288592105495048?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/114288592105495048/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=114288592105495048' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114288592105495048'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114288592105495048'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2006/03/blog-post_20.html' title='अमेरिकन रंगपंचमी'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-114238208164333572</id><published>2006-03-14T15:40:00.000-08:00</published><updated>2006-03-14T16:23:15.603-08:00</updated><title type='text'>होळी रे होळी</title><content type='html'>होळी रे होळी... पुरणाची पोळी...&lt;br /&gt;पूर्वी होळी आली की अश्या आरोळ्या सर्रास ऐकायला यायच्या आणि अगदी काही वर्षापूर्वीपर्यंत त्यात माझाही आवाज सामावलेला असायचा. होळीचा सण म्हणजे खरं तर अभ्यासाचा परमावधी म्हणतात तो काळ. पण होळी जवळ आली की मात्र आम्ही अभ्यासाला दांडी मारायचो. होळीसाठी सरपण गोळा करण्याचे उदात्त कार्य करण्यात वेळ कसा निघून जायचा ते कळायचेदेखील नाही. मग माळ्यावरून मागच्या वर्षीच्या टिमक्या, ढोलकी उतरवली जायची. बरेचदा ओलसरपणामुळे त्यातून नीट आवाज यायचा नाही. मग शेकोटीवर ती तापवायचा कार्यक्रम व्हायचा. एवढं करून ती ठीकठाक वाजली तर नशिब म्हणायचं आई-बाबांचं, कारण ती नाही वाजली तर नवीन टिमकी, ढोलक्यांची खरेदी ठरलेली असायची. एकदा टिमकीचा प्रश्न मिटला की ती वाजवण्यासाठी चांगली काठी शोधण्याचा कार्यक्रम सुरु व्हायचा. चांगली जाडजूड, वाळून घट्ट झालेली काठी मिळाली की देव भेटल्याचा आनंद व्हायचा. अशी सगळी साग्रसंगीत तयारी झाली की मग ह्या टिमक्या किती जोरात वाजतात ह्याचे प्रात्यक्षिक सगळ्या गल्लीला ऐकायला मिळायचे. होळीच्या आदल्या रात्री टिमकी आणि काठी शेजारी घेऊनच आम्ही झोपी जायचो. होळीचा दिवस उगवायचाच पुरणाचा गोड वास घेऊन. शेजारीपाजारी, आमच्या घरी, अगदी सगळ्यांकडे पुरणाचा बेत असायचा. आजीची गडबड पहाटेपासूनच सुरू झालेली असायची. सकाळीच ती दारासमोर रस्त्याचा थोडासा भाग शेणानं सारवून ठेवायची. कामवाल्या मावशींनी आणून दिलेल्या शेण्या बाहेर काढून ठेवायची. आईसुद्धा नेहमीपेक्षा थोडी लवकरच उठायची. आम्ही पण उठून आंघोळी आटपून होळी पेटवायच्या तयारीला लागायचो. शेजारच्या ३-४ घरातले सगळे लोक एकत्र जमायचे आणि दारातली ही छोटी होळी पेटवण्याचा कार्यक्रम पार पडायचा. टिमक्या वाजवत, बोंबा मारत आम्ही होळीला प्रदक्षिणा घालायचो. ह्या होळीला पोळीचा नैवेद्य दाखवला जायचा. होळीत टाकलेली पोळी शेजारचे अण्णा होळीत हात घालून बाहेर काढायचे, तेव्हा अण्णांना भिती वाटत नाही, त्यांना भाजतही नाही, ते खरंच किती महान आहेत वगैरे विचार मनात येऊन जायचे. ही जळालेली करपट चवीची पोळी अण्णा सगळ्या मुलांना प्रसाद म्हणून वाटायचे आणि मग सगळे आपापल्या घरी पोळीवर ताव मारण्यासाठी परतायचे. तुडुंब भरलेल्या पोटांनी मग दुपारी पत्ते, साप-शिडी वगैरे डाव रंगायचे. आई "अभ्यासाला बसा" वगैरे सांगायचा प्रयत्नही करून बघायची. पण तिला कुणी दाद देणार नाही हे तिलाही माहित असायचे. संध्याकाळ झाली की पार्कातल्या मोठ्या होळीची तयारी सुरू व्हायची. तिथं आम्हाला फारसा वाव नसायचा. एखादा दादा किंवा त्यातल्या त्यात तरुण काका इथे आघाडीवर असायचे. चांगली पुरुषभर उंचीची होळी रचली जायची. त्याच्या मधोमध एखादे वाळलेले झाड ठेवले जायचे. मग एखाद्या काकांच्या हस्ते ती पेटवली जायची. इथे बोंब मारण्यात मोठेसुद्धा सामील व्हायचे. काही धीट मुलं ह्या होळीवरून उड्या मारायची, निखा~यांवरून पळून दाखवायची. आम्ही मात्र आ वासून त्यांच्या ह्या करामती बघत राहायचो. होळी विझत आली की लोक पांगायला लागायचे, पण आम्ही मात्र आईच्या रागीट आवाजातल्या हाका येईपर्यंत आमच्या टिमक्या वाजवत तिथेच थांबलेलो असायचो. होळीचा दिवस पुन्हा पुरणपोळ्या चापून संपायचा. पण आम्ही मात्र रंगपंचमीचे विचार मनात घोळवतच झोपी जायचो.&lt;br /&gt;आज ती होळी कुठंतरी हरवून गेली आहे. ऒफिसात ई-पत्रातून आलेल्या फोटोतच होळी बघण्याची वेळ आलेली आहे. काही मिळवण्यासाठी काही गमवावेही लागते म्हणतात. पण अमेरिकेचे "सुवर्णस्वप्न" साकारण्यासाठी मी मात्र अश्या हजारो छोट्याछोट्या आनंदांची होळी केली आहे. कधी वाटतं इतकं गमावण्याच्या लायकीचं होतं का हे स्वप्न? घरी नक्कीच परतायचं आहे, पण "कधी?" हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-114238208164333572?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/114238208164333572/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=114238208164333572' title='5 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114238208164333572'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114238208164333572'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2006/03/blog-post_14.html' title='होळी रे होळी'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>5</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-114185412145094267</id><published>2006-03-08T13:42:00.000-08:00</published><updated>2006-03-08T15:19:22.430-08:00</updated><title type='text'>महिला दिन</title><content type='html'>आज ८ मार्च. जागतिक महिला दिन. महिलांच्या कर्तृत्वाला वंदण्याचा दिवस. पण अजूनही लोक वंदतात ते "हृदयी पान्हा नयनी पाणी" रुपातील बंदिनीला. "त्यागमूर्ती, वात्सल्यसिंधू, प्रेमस्वरुप" मातेला, पत्नीला, स्नुषेला, कन्येला. तिच्यात बुद्धिमान, कर्तृत्ववान, स्वतंत्र विचारांच्या मेधा पाटकर, अरुंधती  रॊय, सुधा मूर्ती, इंदिरा, सोनिया ह्यांच्या प्रतिमा कुणालाच दिसत नाहीत. आजही स्त्रीला पूर्णपणे समजून घेतले नाही आहे समाजानं. त्यांना ती जशी हवी होती, चूल आणि मूल सांभाळणारी, त्याच रुपात तिला बघून स्वप्नरंजन करून घेण्यात दंग आहेत सगळे. पण आजची स्त्री तशी नाही. आजची स्त्री श्यामची आई नाही, सीता-रुक्मिणी नाही, सावित्री-रेणुकाही नाही, मग तरिही तिच्यावर ह्या भूमिका का लादल्या जाव्यात? आजच्या दिवशीतरी तिच्यातल्या ख~या स्त्रीला ओळखा, तिच्या त्या रुपाचा गौरव करा, तुमच्या मनातल्या त्या पौराणिक प्रतिमेचा नको.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-114185412145094267?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/114185412145094267/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=114185412145094267' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114185412145094267'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114185412145094267'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2006/03/blog-post_08.html' title='महिला दिन'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-114135565726081863</id><published>2006-03-02T19:14:00.000-08:00</published><updated>2006-03-03T12:41:54.056-08:00</updated><title type='text'>सख्या रे...</title><content type='html'>मला वाटतं... चालत राहावे तुझा हात धरून, न संपणा~या वाटेवर, क्षितिजाला टेकलेल्या आभाळापर्यंत. वाटेत खाच-खळगे येतील, पायाला काटे रुततील, थकव्यामुळे पाऊल उचलणेदेखील अवघड वाटेल. पण तेव्हा तू असशील सावरायला. कधी आकाशात इंद्रधनुष्य दिसेल, कधी तारकांची रांगोळी, पाखरांचे उन्मुक्त थवे नि कधी जलधारा आणि विजांची एकत्र आतिषबाजी आणि हे सगळे तुझ्या खांद्यावर डोकं टेकून मी बघेन. आपण भांडू कधी कधी, चिडूदेखील एकमेकांवर, मी म्हणेनसुद्धा की "तुला माझी काही किंमतच नाही मुळी", पण तू मला जवळ घेशील आणि क्षणात सगळे वाद विरून जातील तुझ्या आश्वस्त मिठीत. कधी वसंत येईल आणि रंगात न्हालेला निसर्ग तुला मोहून टाकेल, मग सुरेल शीळ घालत तू मला जवळ ओढशील आणि मी लटकंच रागावत तुझ्या कुशीत शिरेन. कधी दिवस रंगून येतील ओल्या मेंदीत, तर कधी काळवंडून येतील ग्रहणानं, पण तरिही असंच चालत रहायचं आहे मला.. तुझ्याबरोबर...तुझा हात धरून...क्षितिजाला टेकलेल्या आभाळापर्यंत आणि त्याच्या पल्याडदेखील...&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-114135565726081863?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/114135565726081863/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=114135565726081863' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114135565726081863'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114135565726081863'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2006/03/blog-post.html' title='सख्या रे...'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-114082801537404662</id><published>2006-02-24T16:40:00.000-08:00</published><updated>2006-02-24T16:41:58.946-08:00</updated><title type='text'>काय हरवलंय?</title><content type='html'>आज वर्तमानपत्रात बातमी वाचली. आमची शाळा आता इंग्रजी माध्यमाची होणार. ही बातमी वाचली आणि उगाचच दुःख झाले. काहीतरी हरवल्यासारखं वाटलं. दोनेक वर्षातून एकदा भारतात गेल्यावर एखादी चक्कर मारणे, एवढाच माझा सध्या शाळेशी संबंध राहिला आहे. आता तर आमच्यावेळचे बरेचसे शिक्षकदेखील निवृत्त झाले आहेत किंवा होण्याच्या मार्गावर आहेत. पण शाळेशी माझी नाळ जोडली गेली आहे त्याचं काय करणार? वयाच्या तिस~या वर्षापासून शाळा माझ्या अस्तित्वाचा एक भाग बनली. मित्र-मैत्रिणी, शिक्षिका, शाळेतले इतर कर्मचारी.. सगळे माझ्या विश्वाचा अविभाज्य भाग होते. कधी कुणाशी भांडण होई, कधी रागावल्या म्हणून बाईंचा राग येई, पण तरिही शाळा कधीच नकोशी वाटली नाही. आमच्याकडे प्रत्येक वर्गाची एकच तुकडी, मोजकीच मुलं असायची. त्यामुळं एकमेकांशी जवळीक खूप होती. खरं तर ते एक मोठं कुटुंबच होतं म्हणा ना. मागच्या वर्षी आमच्या ह्या कुटुंबाचा आधारस्तंभ कोसळला, आमच्या शाळेच्या स्थापनकर्त्या गेल्या. शाळेची सूत्रं नवीन लोकांच्या हातात गेली. 'बदल' अस्तित्वाचा अनिवार्य हिस्सा आहे. जीवनाचा श्वासच.. आज ना उद्या शाळेच्या कार्यप्रणालीत बदल होणारच होता. आणि हा बदल तर चांगल्यासाठी होतो आहे. कितीही कटू वाटलं तरी मराठी माध्यमाच्या शाळांना भविष्य नाही हे सत्य आहे. हे सगळं माहित असूनही काहीतरी गमावल्याची ही भावना का? म्हणतात ना, कळतंय पण वळत नाही. तसं काहीतरी झालंय. का? का व्हावं असं?&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-114082801537404662?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/114082801537404662/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=114082801537404662' title='4 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114082801537404662'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114082801537404662'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2006/02/blog-post_24.html' title='काय हरवलंय?'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>4</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-114057409600187158</id><published>2006-02-21T18:07:00.000-08:00</published><updated>2006-02-21T18:12:24.706-08:00</updated><title type='text'>भ्रष्ट मी</title><content type='html'>काही दिवसांपूर्वी ‘रंग दे बसंती’ पाहिला. तो चित्रपट कसा आहे, त्याचा शेवट योग्य होता की नाही, हिंसा भ्रष्टाचाराचे उत्तर असू शकते का ह्या वादांमध्ये मला सध्यातरी स्वारस्य नाही. पण त्या चित्रपटाने मला स्वतःच्या कर्तव्याची जाणीव करून दिली हे मात्र खरं आहे. एखादी गोष्ट खटकली तरी “आपल्याला काय करायचंय?” ही आपली भूमिका तितकीच राष्ट्रविघातक आहे जितकी ते कृत्य करणा~याची वृत्ती. मग ते कृत्य लाखोंचा गैरव्यवहार असो की चालक परवान्यासाठी दिलेली १०० रुपयांची लाच.&lt;br /&gt;&lt;br /&gt;मागच्या महिन्यात भारतात गेलो होतो. जाताना दिरासाठी होम थिएटर नेले होते. बरीच महाग वस्तू होती. अपेक्षेप्रमाणे विमानतळावर कस्टमच्या लोकांनी अडवले. त्यांना २० डॊलरची लाच देऊन आम्ही बाहेर पडलो. मी स्वतः ते कृत्य केले नाही, माझ्या नव~याने केले. माझा विरोध त्याने डावलला असता हे माहित होते म्हणून मी त्याला सांगण्याचा प्रयत्नही केला नाही. पण तसा प्रयत्न मी करायला हवा होता हे मात्र नक्की. अजूनही मला बोच आहे मी एका गुन्ह्यात सहभागी झाले ह्याची. मी प्रयत्न केला असता आणि मग त्याने माझे ऐकायला नकार दिला असता तर गोष्ट वेगळी होती, पण मी न लढता माघार घेतली. हा अक्षम्य गुन्हा होता. थोडक्यात मी भ्रष्टाचाराला हातभार लावला. माझ्या आयुष्यात इतक्या उघडपणे भ्रष्टाचार पाहण्याची ही पहिली वेळ. आणि मी ते केवळ पाहिले नाही तर त्यात सहभागी झाले. का?&lt;br /&gt;&lt;br /&gt;परत आल्यावर हा चित्रपट पाहिला आणि गुन्ह्याची जाणीव आणखी तीव्र झाली. ह्यापुढे असे प्रसंग आले तर आपण वाकायचे नाही हे ठरवले आहे. “हे असंच चालायचं” असे म्हणून ह्या भ्रष्ट “सिस्टम”चा आपणही एक हिस्सा बनायचे नाही. २० डॊलरची लाच देत देत आमच्या जाणिवा इतक्या बोथट होतील की उद्या २० हजाराची लाच देतानाही मन कचरणार नाही. मग आम्ही आमच्या मुलांसमोर काय आदर्श ठेवणार? त्यांना कुठल्या तोंडानं सांगणार हे चूक आहे म्हणून. फ़क्त लाच न घेणे म्हणजे प्रामणिकपणा नव्हे, लाच न देणे हासुद्धा त्याचा महत्त्वाचा हिस्सा आहे.&lt;br /&gt;असो. ह्या सगळ्यातून एक गोष्ट मात्र समजली की अजून तरी मी पूर्णपणे विसरले नाही आहे प्रामाणिकपणाचे धडे. योग्यायोग्यतेची थोडीफार जाणीव अजून शिल्लक आहे आणि चूक केल्यावर अजूनही आपलंच मन खातं आहे. थोडक्यात अजून निगरगट्ट व्हायला वेळ आहे तर.&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-114057409600187158?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/114057409600187158/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=114057409600187158' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114057409600187158'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/114057409600187158'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2006/02/blog-post_21.html' title='भ्रष्ट मी'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-113996728534309071</id><published>2006-02-14T16:41:00.000-08:00</published><updated>2006-02-14T17:34:45.353-08:00</updated><title type='text'>प्रेमोत्सव</title><content type='html'>एकदा वपुंच्या एका कथेत वाचले होते "जीवनाचा उत्सव करावा", खर्डेघाशी करत, रडत खडत तर सगळेच जगतात, पण छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवत, तो आनंद एखाद्या मोठ्या उत्सवासारखा साजरा करत जगणारे जीव आगळेच. आज १४ फ़ेब्रुवारी, व्ह॓लेंटाईन डे. प्रेम साजरा करण्याचा दिवस. आता हा दिवस साजरा करणे म्हणजे काहितरी आगळीक असावी असे वागत आहेत कित्येक राजकीय पक्ष. आत्ताच वाचले, दुकानात, बागेत, रस्त्यावर एकत्र फिरणार्या जोडप्यांना खोटे लग्न विधी करायला लावले काही धेडगुजरांनी, ज्यांनी नकार दिला त्यांना राखी बांधायला लावली, आता त्यांचे फोटो त्यांच्या घरी पाठवणार आहेत म्हणे. किती वेडेपणा आहे हा? त्या जोडप्यातले किती तरी लोक अगदी चांगले मित्र-मैत्रिणी असतील, काही जण नुसते ओळखत असतील एकमेकांना. बहिण-भाऊ आणि नवरा-बायकॊ ही २च नाती असू शकतात का मुलामुलींमध्ये? विशुद्ध मैत्री असेही काही असते हे माहित नसावे ह्या लोकांना बहुदा. कित्येकजण म्हणतात प्रेमासाठी असा दिवस कशाला राखून ठेवायला हवा? पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण आहे हे, ह्या दिवसाचे बाजारिकरण होते आहे वगैरे वगैरे... पण मी म्हणते आपण जर वटपौर्णिमा साजरी करू शकतो, भाऊबीज-रक्षाबंधन साजरे करू शकतॊ तर हा दिवस का नाही? बाजारीकरणाचं म्हणाल तर ते कुठे नाही? दिवाळी असो, गणेशोत्सव असो, रंगपंचमी असो, कोणता सण आपण आज पारंपारिक पद्धतीनं साजरा करतोय? so called संस्कृतीरक्षकांनो, एकमेकांवरचे प्रेम व्यक्त करण्याच्या ह्या सणाला पाश्चात्त्यांचे अंधानुकरण म्हणून डावलण्यापेक्षा आपल्या मुलांना श्लोक-स्तोत्र शिकवणे, त्यांच्याशी मराठीत बोलणे कमीपणाचे मानणार्या मम्मी-पप्पांना संस्कृतिचे धडे द्या, त्यांना आपल्या परंपरांची जाणीव करून द्या. त्याने जास्त संस्कृतिरक्षण होईल.&lt;br /&gt;&lt;br /&gt;जाऊ दे.. माझे म्हणाल तर जीवनाचा उत्सव करायला मला आवडते. माझे त्याच्यावरचं प्रेम व्यक्त करण्याची ही सुवर्णसंधी निदान मी तरी गमावणार नाही आहे.  ज्यांना ह्या दिवसाबद्दल जिव्हाळा आहे, त्या सर्वांना आजच्या दिवशी हार्दीक शुभेच्छा!!&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-113996728534309071?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/113996728534309071/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=113996728534309071' title='1 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/113996728534309071'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/113996728534309071'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2006/02/blog-post_14.html' title='प्रेमोत्सव'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>1</thr:total></entry><entry><id>tag:blogger.com,1999:blog-22119614.post-113994525989955499</id><published>2006-02-14T11:25:00.000-08:00</published><updated>2006-02-14T17:36:19.193-08:00</updated><title type='text'>सत्ययुगाची चाहूल</title><content type='html'>&lt;div align="justify"&gt;&lt;span style="color:#330033;"&gt;काकांनी परवा जे काही सांगितले त्यात किती तथ्य होते कोण जाणे, पण ती कल्पना मात्र खूप आवडली मला. खरेच असेल का हा कलियुगाचा अंत? खरेच परतून येईल का सत्ययुग? काका म्हणाले, सोने शुद्ध करताना ते मुशीत तापवतात, मग त्यातल्या अशुद्धी वरती तरंगायला लागतात, त्या बाहेर काढल्या की जे उरते ते असते शुद्ध सोने. अगदी १००% खरे सोने. सध्या आपले जग ह्या मुशीत आहे. कलियुग संपतेय, त्यामुळे आता जगातल्या सगळ्या वाईट गोष्टी नष्ट झाल्या पाहिजे. त्यासाठी सुनामी, वादळे, पाऊस, हिमवादळे सुरू आहेत, जगात सगळी उलथापालथ होते आहे. माणूस माणसाचा वैरी झाला आहे. सगळे जग सैरावैरा धावते आहे मनःशांतीच्या शोधात. पण ह्या सगळ्याचा अंत जवळ येतोय. आणखी काहिशे वर्षात सत्ययुग सुरू होईल. मानवता पुन्हा त्या शुद्ध रुपाला जाऊन पोहोचेल. अर्थात हे सगळे बघायला तुम्ही आणि मी नसणार म्हणा.,, कोण जाणे असू सुद्धा, पुनर्जन्म खरेच असेल तर असू सुद्धा, पण मी ह्या सोन्यातली अशुद्धी असेन तर? तर.. सत्ययुग तुम्हाला लखलाभ असो… मी आपली कलियुगाचीच मजा लुटावी म्हणते…&lt;/span&gt;&lt;/div&gt;&lt;div class="blogger-post-footer"&gt;&lt;img width='1' height='1' src='https://blogger.googleusercontent.com/tracker/22119614-113994525989955499?l=manogate.blogspot.com' alt='' /&gt;&lt;/div&gt;</content><link rel='replies' type='application/atom+xml' href='http://manogate.blogspot.com/feeds/113994525989955499/comments/default' title='Post Comments'/><link rel='replies' type='text/html' href='http://www.blogger.com/comment.g?blogID=22119614&amp;postID=113994525989955499' title='0 Comments'/><link rel='edit' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/113994525989955499'/><link rel='self' type='application/atom+xml' href='http://www.blogger.com/feeds/22119614/posts/default/113994525989955499'/><link rel='alternate' type='text/html' href='http://manogate.blogspot.com/2006/02/blog-post.html' title='सत्ययुगाची चाहूल'/><author><name>मनोगते</name><uri>http://www.blogger.com/profile/02289064559704209178</uri><email>noreply@blogger.com</email><gd:image rel='http://schemas.google.com/g/2005#thumbnail' width='16' height='16' src='http://img2.blogblog.com/img/b16-rounded.gif'/></author><thr:total>0</thr:total></entry></feed>
